शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

'११ महिन्यांत ५०४ जणांचा अपघाती मृत्यू'; शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 16:48 IST

वेग आवरा, वाहन हळू चालवा

- राम शिनगारेऔरंगाबाद : शहर, जिल्ह्यामध्ये २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लावलेले होते. या काळात रस्त्यावर वाहने येत नव्हती. त्यामुळे अपघातांची संख्या घटली होती. २०२१ मध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर वाहने रस्त्यावर आली. त्यातही प्रत्येकाला स्वत:च्या वाहनातूनच प्रवास करायचा असल्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या मोठी आहे. शहरातील बीड बायपासवर अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

११ महिन्यांत ५०४ जणांचा मृत्यूशहर आणि जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते ३१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तब्बल ५०४ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. यातील १३९ मृत्यू हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये झाले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये अपघातात ३६५ मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली. शहरात नोव्हेंबरपर्यंत ४२७ अपघात झाले. त्यात ३५८ जण गंभीर जखमी झाले. १३९ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये नोव्हेंबरपर्यंत ५४० अपघात झाले आहेत. त्यात जीवघेण्या अपघातांची संख्या ३३६ आहे. त्यात एकूण ३६५ जणांना प्राणास मुकावे लागले. जखमींची संख्या २५४ आहे.

सर्वाधिक मृत्यू बीड बायपासवरशहर पोलिसांच्या हद्दीत झालेल्या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे बीड बायपासवर झाले आहेत. त्यातच आता बीड बायपासचे काम सुरू असून, नवीन बायपास वाहतुकीला खुला झाला आहे. त्यावरही अपघातांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे बायपासवर वाहन हळू चालविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावाशहरातील अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले पाहिजे. याशिवाय चारचाकी गाडीमध्येही सीट बेल्ट लावलेला असेल तरच अपघाताच्या वेळी सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा कार्यरत होते. त्यामुळे सीट बेल्ट लावलाच पाहिजे, असे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले.

वेग आवरारस्त्यावर वाहन चालविताना काही वेगाची मर्यादा घालून दिलेली आहे. ही मर्यादा ओलांडू नये. वेगावर आवर घातल्यास प्राणांतिक अपघातांची संख्या कमी होऊ शकते, असेही निरीक्षक आघाव यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद