शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

'११ महिन्यांत ५०४ जणांचा अपघाती मृत्यू'; शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 16:48 IST

वेग आवरा, वाहन हळू चालवा

- राम शिनगारेऔरंगाबाद : शहर, जिल्ह्यामध्ये २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लावलेले होते. या काळात रस्त्यावर वाहने येत नव्हती. त्यामुळे अपघातांची संख्या घटली होती. २०२१ मध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर वाहने रस्त्यावर आली. त्यातही प्रत्येकाला स्वत:च्या वाहनातूनच प्रवास करायचा असल्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या मोठी आहे. शहरातील बीड बायपासवर अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

११ महिन्यांत ५०४ जणांचा मृत्यूशहर आणि जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते ३१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तब्बल ५०४ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. यातील १३९ मृत्यू हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये झाले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये अपघातात ३६५ मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली. शहरात नोव्हेंबरपर्यंत ४२७ अपघात झाले. त्यात ३५८ जण गंभीर जखमी झाले. १३९ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये नोव्हेंबरपर्यंत ५४० अपघात झाले आहेत. त्यात जीवघेण्या अपघातांची संख्या ३३६ आहे. त्यात एकूण ३६५ जणांना प्राणास मुकावे लागले. जखमींची संख्या २५४ आहे.

सर्वाधिक मृत्यू बीड बायपासवरशहर पोलिसांच्या हद्दीत झालेल्या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे बीड बायपासवर झाले आहेत. त्यातच आता बीड बायपासचे काम सुरू असून, नवीन बायपास वाहतुकीला खुला झाला आहे. त्यावरही अपघातांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे बायपासवर वाहन हळू चालविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावाशहरातील अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले पाहिजे. याशिवाय चारचाकी गाडीमध्येही सीट बेल्ट लावलेला असेल तरच अपघाताच्या वेळी सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा कार्यरत होते. त्यामुळे सीट बेल्ट लावलाच पाहिजे, असे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले.

वेग आवरारस्त्यावर वाहन चालविताना काही वेगाची मर्यादा घालून दिलेली आहे. ही मर्यादा ओलांडू नये. वेगावर आवर घातल्यास प्राणांतिक अपघातांची संख्या कमी होऊ शकते, असेही निरीक्षक आघाव यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद