शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मनपाकडून ‘सीएनडी’ प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:53 IST

'स्वच्छ भारत'मध्ये झेप घेतल्याने महापालिकेचा उत्साह वाढला 

ठळक मुद्देरमानगर येथील जागा निश्चितलवकरच निविदा काढणार

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधील सर्वेक्षणात औरंगाबाद शहराने ४७ वरून २६ व्या स्थानावर झेप घेतल्याने महापालिकेचा उत्साह द्विगुणित झाला आहे. शहरात दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहेत, तर तिसरा हर्सूल येथील प्रकल्प प्रगतिपथावर आहे. आता शहरातील बांधकाम साहित्यापासून सिमेंटच्या विटा तयार करणारा प्रकल्प रमानगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार असून, याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

इंदूर महापालिकेने चार वर्षांपूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू केले आहेत. उद्यानात जमा होणाऱ्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती, शहरातील बांधकाम साहित्यापासून विटा तयार करणे असे अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारले आहेत. औरंगाबाद महापालिकेने कचरा कोंडीनंतर इंदूर महापालिकेप्रमाणे डीपीआर तयार केला. या कामासाठी इंदूर येथील प्रकल्प सल्लागार समिती नेमली. या समितीने तयार केलेल्या डीपीआरला महाराष्ट्र शासनाने १४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून आतापर्यंत महापालिकेने चिकलठाणा येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू केला. त्यापाठोपाठ पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा दुसरा प्रकल्प सुरू झाला आहे. हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा तिसरा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे बायोगॅस प्रकल्पही पूर्ण झाला आहे. मात्र तो  सुरू केलेला नाही. आता लवकरच बांधकाम साहित्यासाठी स्वतंत्र प्रकल्प रमानगर येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

पीपीपी मॉडेलवर प्रकल्पहा सीएनडी प्रकल्प ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ या तत्त्वावर राहणार असून, ज्या कंत्राटदाराला या प्रकल्पात रस आहे त्याला ५० टक्के रक्कम गुंतवावी लागेल. प्रकल्प उभारणीसाठी ५० टक्के वाटा महापालिकेचा राहणार आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका