शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक पाणी, नळांना मीटरसोबत छत्रपती संभाजीनगरकरांना येणार भरभक्कम पाणीपट्टी

By मुजीब देवणीकर | Updated: July 2, 2024 18:59 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेचे डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा केला जात असला तरी मार्च २०२५ पर्यंत पाणी शहरात येण्याची शक्यता आहे. नागरिकांना दररोज २४ तास पाणी मिळेल, सोबतच नळांना मीटरही लावले जाईल. पाणीपट्टीही भरभक्कम राहणार असून, पूर्वीप्रमाणे ४ हजार ५० रुपये वसूल केले जाण्याची दाट शक्यता आहे.

डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. त्यासोबतच पाणीपट्टीतही वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनंतर पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यावेळी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी होती. सध्या २ हजार २५ रुपये पाणीपट्टी आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत ही सूट रद्द होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शहरातील सर्व नळांना मीटर लावले जाणार असल्यामुळे नवे दरही लागू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

वॉटर बॉयलॉजचे दरसमांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने वॉटर बॉयलॉज तयार करून राज्य शासनाची मंजुरी घेतली होती. त्यानुसार नव्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्यासाठी प्रतिलीटर पाण्याचे दर लागू केले जातील. सध्या फक्त निवासी, व्यावसायिक या प्रकारात व अर्धा, पाऊण, एक ते पाच इंचांपर्यंत महापालिका नळ कनेक्शन देते. त्यासाठीचे दर ठरलेले आहेत. पण यापुढे प्रतिलीटर पाण्याचे दर लागू होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी