शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मुबलक पाणी, नळांना मीटरसोबत छत्रपती संभाजीनगरकरांना येणार भरभक्कम पाणीपट्टी

By मुजीब देवणीकर | Updated: July 2, 2024 18:59 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेचे डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा केला जात असला तरी मार्च २०२५ पर्यंत पाणी शहरात येण्याची शक्यता आहे. नागरिकांना दररोज २४ तास पाणी मिळेल, सोबतच नळांना मीटरही लावले जाईल. पाणीपट्टीही भरभक्कम राहणार असून, पूर्वीप्रमाणे ४ हजार ५० रुपये वसूल केले जाण्याची दाट शक्यता आहे.

डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. त्यासोबतच पाणीपट्टीतही वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनंतर पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यावेळी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी होती. सध्या २ हजार २५ रुपये पाणीपट्टी आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत ही सूट रद्द होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शहरातील सर्व नळांना मीटर लावले जाणार असल्यामुळे नवे दरही लागू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

वॉटर बॉयलॉजचे दरसमांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने वॉटर बॉयलॉज तयार करून राज्य शासनाची मंजुरी घेतली होती. त्यानुसार नव्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्यासाठी प्रतिलीटर पाण्याचे दर लागू केले जातील. सध्या फक्त निवासी, व्यावसायिक या प्रकारात व अर्धा, पाऊण, एक ते पाच इंचांपर्यंत महापालिका नळ कनेक्शन देते. त्यासाठीचे दर ठरलेले आहेत. पण यापुढे प्रतिलीटर पाण्याचे दर लागू होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी