शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

एमपीएससी विद्यार्थ्यांचा १३ रोजी मुंबईत आक्रोश महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 20:14 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आयोजन समितीचे बाळासाहेब सानप यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, राज्यात लाखो विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देत असतात. मात्र, एकूण रिक्त पदांपैकी १० टक्केच पदांसाठी परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया केली जाते. यामुळे एका पदासाठी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यात सरकारने आता कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरूकेली आहे. यामुळे अनेक सरकारी कार्यालयांत तुटपुंज्या पगारात युवक नोकर्‍या करीत आहेत. वरचा मलिदा कंत्राटदार खात आहेत. सरकारने कंत्राट पद्धत बंद करावी, तसेच नोकरभरतीवरील निर्बंध हटवावेत. सरळ सेवेतील ३० टक्के कपातीचे धोरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी मुंबईत १३ मार्च रोजी आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे.  अ‍ॅड. राहुल तायडे यांनी सांगितले की, या राज्यातील १ लाख युवक मुंबईतील महामोर्चात सहभागी होणार आहे.  यावेळी डॉ. कुणाल खरात, सचिन डोईफोडे, नीलेश आंबेवाडीकर, वैभव मिटकर व संघर्ष समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  

प्रमुख मागण्या- शिक्षकांची रिक्त २४ हजार पदे तात्काळ भरावीत.- जिल्हा परिषद, मनपाच्या शाळा बंद करूनयेत. - जि.प.जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास विभागातील जागा १०० टक्के भराव्यात. - सर्व स्पर्धा परीक्षा शुल्क १०० ते २०० रुपयांपर्यंत आकारण्यात यावे. - सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह २ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा. - भरती प्रक्रियेसंदर्भात तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा. 

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद