शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

एमपीएससी विद्यार्थ्यांचा १३ रोजी मुंबईत आक्रोश महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 20:14 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आयोजन समितीचे बाळासाहेब सानप यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, राज्यात लाखो विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देत असतात. मात्र, एकूण रिक्त पदांपैकी १० टक्केच पदांसाठी परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया केली जाते. यामुळे एका पदासाठी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यात सरकारने आता कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरूकेली आहे. यामुळे अनेक सरकारी कार्यालयांत तुटपुंज्या पगारात युवक नोकर्‍या करीत आहेत. वरचा मलिदा कंत्राटदार खात आहेत. सरकारने कंत्राट पद्धत बंद करावी, तसेच नोकरभरतीवरील निर्बंध हटवावेत. सरळ सेवेतील ३० टक्के कपातीचे धोरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी मुंबईत १३ मार्च रोजी आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे.  अ‍ॅड. राहुल तायडे यांनी सांगितले की, या राज्यातील १ लाख युवक मुंबईतील महामोर्चात सहभागी होणार आहे.  यावेळी डॉ. कुणाल खरात, सचिन डोईफोडे, नीलेश आंबेवाडीकर, वैभव मिटकर व संघर्ष समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  

प्रमुख मागण्या- शिक्षकांची रिक्त २४ हजार पदे तात्काळ भरावीत.- जिल्हा परिषद, मनपाच्या शाळा बंद करूनयेत. - जि.प.जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास विभागातील जागा १०० टक्के भराव्यात. - सर्व स्पर्धा परीक्षा शुल्क १०० ते २०० रुपयांपर्यंत आकारण्यात यावे. - सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह २ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा. - भरती प्रक्रियेसंदर्भात तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा. 

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद