शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद पुलावर भरधाव ट्रॅव्हल्स आली, बचावाच्या प्रयत्नात सिमेंटने भरलेला ट्रक नदीत कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 18:24 IST

समाेरुन भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाचविण्याच्या प्रयत्नात हा ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट नदीच्या पाण्यात कोसळला. 

दावरवाडी (औरंगाबाद) : पैठण - पाचोड राज्य महामार्गावरील दावरवाडी डेरा फाट्याजवळ सिमेंटने भरलेला एक ट्रक पुलावरुन वीरभद्रा नदीच्या पात्रात कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिमेंट व ट्रकचे मोठे नुकसान झाले.

कर्नाटक राज्यातील तांडोर येथून सिमेंट घेऊन नाशिक येथे निघालेला ट्रक (क्र. केए ५६, ३६३९) गुरुवारी रात्री पाचोडकडून जात होता. डेरा फाट्याजवळील वीरभद्रा नदीच्या पुलावरून जाताना समाेरुन भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाचविण्याच्या प्रयत्नात हा ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट नदीच्या पाण्यात कोसळला. तुडूंब भरलेल्या नदीत ट्रकचा समोरील भाग बुडाल्याने चालक व वाहक दोघेही संकटात सापडले होते. दोघांनाही पोहता येत नव्हते. जिवाच्या आकांताने त्यांनी कसेबसे केबीनमधून बाहेर पडून आपला जीव वाचविला. यात ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून, ३२ टन सिमेंटही खराब झाले. अपघाताची माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे बीट जमादार किशोर शिंदे, फिरोझ बर्डे, ए. व्ही. काकडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अरुंद पुलामुळे अडचणपैठण - पाचोड राज्य महामार्गावरुन दिवसभरात जालना, बुलढाणा, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबईसह परराज्यातील केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान येथील शेकडो अवजड व खाजगी वाहने ये-जा करतात. या रस्त्यावरील वीरभद्रा नदीचे पात्र मोठे असून, यावर अरुंद पूल आहे. यामुळे वर्षभरात येथे चारवेळा अपघात झाला. या पुलाची लांबी, रुंदी वाढवावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात