शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे सामाजिक प्रश्नांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते: सरन्यायाधीश भूषण गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:38 IST

समता, बंधुता व सामाजिक न्यायाची जपणूक केल्याने हा बहुमान; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी छत्रपती संभाजीनगरात सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या भावना

छत्रपती संभाजीनगर: एक चांगला न्यायाधीश हा वकिलांशी मैत्री ठेवूनही निःपक्षपाती राहू शकतो. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्यांचे आकलन होते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते, असे ठाम मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे गुरुवारी रात्री व्यक्त केले.

औरंगाबाद खंडपीठ संघातर्फे एमजीएमच्या वकील रुख्मिणी सभागृहात आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. घटनेचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व माझे वडील रामचंद्र गवई यांच्या विचारांचा वारसा समता, बंधुता व सामाजिक न्याय यांची जपणूक करीत वाटचाल करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानेच देशाच्या सर्वाेच्च न्यायाधीशपदाचा बहुमान मिळाला. हे सतीचे वाण असून, ते निष्ठापूर्वक पालन करण्याचा प्रयत्न मी कसोशीने करतो, अशा भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्ना वराळे, न्या. ए.एस. चांदूरकर, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे, न्या. नितीन सांबरे, न्या. विभा कंकणवाडी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष विठ्ठल बी. कोंडे देशमुख आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई आणि सुविद्य पत्नी डाॅ. तेजस्विनी गवई, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश बोरूलकर व सचिव ॲड. रवींद्र गोरे यांचीही विशेष उपस्थिती हाेती.

सर्वोच्च न्यायालय सर्व न्यायमूर्तींचे‘सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तींचेच असते. त्यामुळे निर्णय हा एकमतानेच व्हायला हवा. एकट्याने काम करता येत नाही. एक चांगला न्यायाधीश हा वकिलांशी मैत्री ठेवूनही निःपक्षपाती राहू शकतो. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो, असे ठाम मत त्यांनी मांडले. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्यांचे आकलन हाेते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते.

‘लोकमत’चा लेख आणि फोन...या सत्कारानिमित्त निवृत्त न्या. पुखराज बोरा यांनी ‘लोकमत’मध्ये लिहिलेल्या लेखाचा उल्लेख करून सरन्यायाधीश गवई म्हणाले की, ‘मी हा लेख वाचला. लेख वाचून त्यांना फोन करून लेख चांगला झाल्याचे सांगितले. त्यांनी या लेखाबद्दल दोनदा आपल्या भाषणात उल्लेख केला. अनेक न्यायमूर्ती चांगले निकालपत्र लिहितात; पण त्यांचे कुणी अभिनंदन करीत नाही; परंतु नाशिक येथे प्रधान न्यायाधीश असताना न्या. बोरा यांनी दिलेल्या चांगल्या निकालपत्राबद्दल मी फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते, तसे आजही केले’, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोल्हापूरसाठी मी नेहमी पाठिंबा दिला‘कोल्हापूरसाठी स्वतंत्र सर्किट खंडपीठ असावे, ही मागणी जेव्हा जेव्हा झाली, तेव्हा मी तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण नेहमी देतो. जेव्हा औरंगाबाद खंडपीठ सुरू झाले. त्यावेळी त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले; परंतु आज येथे दरवर्षी जेवढे खटले दाखल होतात, ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपेक्षा अधिक आहेत’, असे गवई यांनी नमूद केले.

न्यायाधीश निवडीत गुणवत्ता महत्त्वाचीगवई कोलेजियमबाबत म्हणाले की, ‘आम्ही नेहमीच गुणवत्तेवर आधारित न्यायाधीशांची निवड करण्यावर भर दिला आहे. उमेदवाराची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी, हे कधीही निकष ठरत नाहीत. केवळ त्यांची पात्रता, ज्ञान व नीतिमत्ता हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय