शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नवरी मिळेना शेतकरी नवऱ्याला, शेती पाहिजे पण शेत कसणारा नवरा नको

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 4, 2023 19:00 IST

शेतकरी नवरा नको गं बाई; पस्तिशीतही नवरी मिळेना !

छत्रपती संभाजीनगर : तुळशीचे लग्न लागले आणि लग्नसराईला धूमधडाक्यात सुरुवात झाली. पण, या धामधुमीपासून अनेक नवरदेव वंचित आहेत. कारण, त्यांची वयाची पस्तिशी ओलांडली, पण अजून त्यांना वधू मिळेना. त्यात शेतकरी तरुणांचे तर हाल विचारूच नका. कोट्यवधीची शेतजमीन आहे, पण तरुणी लग्न करायला तयार नाहीत. कारण, शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई, असे वधू व तिच्या आई-वडिलांची भूमिका आहे. यामुळे वय वाढत आहे व लग्नही जुळत नाही.

मुलींपेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढलीमागील दहा वर्षांत तरुणांची संख्या वाढली व तरुणींची संख्या त्यातुलनेत कमी होत आहे. आता काही व्यावसायिक वधू-वर सूचक मंडळात तरुणींची नाव नोंदणी मोफत केली जात आहे. १ हजार तरुणांमागे ९५० तरुणी असल्याने तरुणांच्या लग्नाची चिंता वाढली आहे.

काय कारणे आहेत.१) मुलींच्या अपेक्षा वाढल्या : आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पॅकेज मिळू लागल्याने तरुणींचा ओढा आयटी क्षेत्रातील तरुणांशी लग्न करण्याकडे आहे.२) मुंबई-पुणे-बंगलोर : पुणे, मुंबई- बंगलोर- हैदराबाद या महानगरात बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तेथील पगारही लाखोत आहे. त्यातुलनेत मराठवाड्यात कमी पगार मिळतो. यामुळे या महानगरातील तरुणाशी आपल्या मुलीचे लग्न लागावे, अशी मुलीच्या आई व वडिलांची इच्छा आहे.३) समानक्षेत्रातील स्थळ : मुलगी इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, सीए असेल तर त्यांना त्यांच्याच क्षेत्रातील तरुणाचे स्थळ शक्यतो पाहिले जाते. अपेक्षेपेक्षा कमी स्थळ मिळाले तर तरुणी नकार देतात.

या मुलांच्या लग्नाची चिंताशेतकरी : शेतकरी तरुण असेल तर तरुणी त्याच्याशी लग्न करण्यास तयार होत नाही, कारण शेतातील कामाची कष्ट करण्याची मानसिकता नाही. सततच्या ओल्या व कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे जीवन अधिक कठीण झाले आहे. शेतकरी तरुण उच्च शिक्षित असला तरी नकारच मिळतो. यामुळे शेतकरी तरुणांचे लग्न रखडत आहे.पुरोहित : पुरोहितांचा व्यवसाय हंगामी मानला जातो. आज अनेक पुरोहितांना मोठी कमाई असली तरी तरुणी पुरोहित तरुणाला नकार देत असल्याने अनेक पुरोहितांचे वय ४५ वर जाऊन ठेपले तरी लग्न होत नाही. कमी शिक्षित : तरुणी अभ्यासात हुशार असतात. हे दरवर्षीच्या निकालावरून सिद्ध असते. तसेच उच्च शिक्षितांमध्ये तरुणींचे प्रमाण जास्त आहे. तरुणींच्या तुलनेत तरुणांचे कमी शिक्षण हासुद्धा ‘लग्न’ जमण्यात अडसर ठरत आहे.कमी पगार : अनेक तरुण सर्वसामान्य नोकरी करतात. त्यांचा पगारही कमी आहे. कमीत कमी ५० हजार रुपयांपेक्षा दरमहा जास्त पगार मिळविणाऱ्या तरुणाचे स्थळ वधूकडील मंडळी शोधत असतात.

‘जुळवून घेणे’ हाच पर्यायउच्च शिक्षित तरुणींना त्यांच्या क्षेत्रातील तरुण असावा असे वाटते. ही अपेक्षा योग्य आहे, पण कमी शिक्षित तरुणींचाही उच्च शिक्षित व मोठ्या पॅकेजच्या तरुणाशीच लग्न करण्याकडे कल असतो. यात काहीच हरकत नाही. पण जर वयाची तिशी ओलांडल्यावर तरुणींनीही आपल्या अपेक्षा कमी करून चांगले स्थळ असले तर ‘जुळवून घेणे’ महत्त्वाचे आहे.-सुधीर नाईक, वधू-वर सुचक मंडळ

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्नAurangabadऔरंगाबाद