शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अपघातानंतर शेतकरी अडकला तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याच्या कठड्याला; तासाभरानंतर झाली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:42 IST

पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बंधाऱ्याच्या तीन फुट रुंद भिंतीवरून जीव मुठीत घेऊन प्रवास; सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील घटना

सिल्लोड : दुचाकीवरून जाणारा एक शेतकरी पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात दुचाकीसह पडला. परंतु सुदैवाने कठड्याला अडकल्याने तो बालंबाल बचावला. ही घटना तालुक्यातील धानोरा शिवारात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. धरमसिंग रतनसिंग उसारे (३५, रा. उसारेवाडी, धानोरा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील काकडेवाडीजवळ पूर्णा नदीवर कोल्हापुरी बंधारा आहे. नदीला पाणी असल्याने शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे लावून पाणी अडवलेले आहे. यामुळे काकडेवाडी, उसारेवाडी, पूर्णावाडी, बेलेश्वरवाडी येथील शेतकऱ्यांना धानोरा तसेच पळशीला येण्या-जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. यामुळे परिसरातील शेतकरी या बंधाऱ्याच्या तीन-चार फूट रुंद असलेल्या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून ये-जा करतात. गुरुवारी सायंकाळी याच कोल्हापुरी बंधाऱ्यावरून काकडेवाडीमार्गे भराडी येथून धरमसिंग हा शेतकरी दुचाकीवरून जात होता. धानोरा शिवारातील या बंधाऱ्यावर आल्यानंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने धरमसिंग दुचाकीसह नदीत कोसळला. दुचाकी नदीत कोसळली तर धरमसिंग यांनी बंधाऱ्याचा कठडा पकडला.

दैव बलवत्तर म्हणून वाचला जीवदुचाकीसह खाली पडल्यानंतर धरमसिंग यांच्या हाताला बंधाऱ्याचा कठडा लागला. कठडा सोडला तर पाण्यात बुडून आपला मृत्यू होऊ शकतो, अशी मनात भीती बाळगून मला वाचवा.. मला वाचवा.. असे मोठ्याने तो ओरडत होता. परंतु तब्बल एक तास बंधाऱ्यावर कुणीच आले नसल्याने कठड्याला तो लटकलेला होता. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, असे दृष्य होते. तब्बल एक तासाने एक शेतकरी बंधाऱ्याजवळ आल्यानंतर त्याने हे दृष्य बघितले. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना त्याने घटनास्थळी बोलावून घेतले. लागलीच धरमसिंग यांना मोठ्या शिताफीने सर्व शेतकऱ्यांनी ओढून बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून धरमसिंग या घटनेतून बचावला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघातFarmerशेतकरी