शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वादळी वाऱ्यात जखमी बाल फुटबॉलपटूचा पाय कापावा लागला, तरीही आयुष्याची मॅच हरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 11:54 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा तिसरा बळी; फुटबाॅलपटू दक्षची मृत्यूशी झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्यामुळे पत्रा उडून गंभीर जखमी झालेला ८ वर्षीय दक्ष अभय वारे याची तब्बल ४३ तास मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरू असताना रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. फुटबाॅलच्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करीत सर्वांची मने जिंकणारा दक्ष आयुष्याची मॅच हरल्याने एकच हळहळ व्यक्त झाली.

शहरात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा दक्ष हा तिसरा बळी ठरला. शहानूरमियाँ दर्गाह परिसरात शनिवारी सायंकाळी दक्ष (रा. पन्नालालनगर) हा नेहमीप्रमाणे फुटबाॅल क्लाससाठी गेला होता. वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार वारे वाहू लागले. सर्व मुलांनी सुरक्षित जागेकडे धाव घेतली. दक्षनेही धाव घेतली. मात्र, त्याच वेळी वादळी वाऱ्याने पत्रा उडून त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा पाय मांडीपासून कापावा लागला. पाय गेला तर गेला, दक्ष सुखरूपपणे या सगळ्यातून बाहेर पडावा, अशीच प्रार्थना दक्षला वाचविण्यासाठी प्रत्येक जण करीत होता. मात्र, उपचार सुरू असताना दक्षचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅ. प्रफुल्ल पांडे यांनी दिली.

अंत्यविधीला गर्दी, अश्रूंचा फुटला बांधदक्षने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला कळली आणि सर्वांना एकच धक्का बसला. दक्षच्या पार्थिवावर कैलासनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांसह दक्षला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांपासून ते उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

मुलांना कसे सांगणार, दक्ष गेला?दक्षच्या अनेक मित्रांचे कुटुंब अंत्यविधीला आले होते. दक्ष हा फुटबाॅलसह मित्रांबरोबर क्रिकेट, बॅडमिंटनही खेळत असे. दक्ष हा सर्वांना सोडून गेला, हे मुलांना कसे सांगायचे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू