शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

प्रवास्यांना मोठा फटका! औरंगाबादहून मुंबईसाठी सायंकाळची विमानसेवा मार्चअखेर बंद होणार

By संतोष हिरेमठ | Updated: February 20, 2023 12:38 IST

प्रवासी, उद्योजक, पर्यटकांना बसणार फटका; विमानसेवा कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज

औरंगाबाद : मुंबईसाठी सायंकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची मुंबई- औरंगाबाद-मुंबई विमानसेवा मार्चअखेर बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी पुन्हा एकदा पहाटेच्या विमानसेवेवरच औरंगाबादकरांना अवलंबून राहावे लागेल. याचा उद्याेग, व्यावसायिक, पर्यटकांना मोठा फटका बसेल. त्यामुळे आमदार, खासदारांनी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

इंडिगोचे सायंकाळी उड्डाण घेणारे विमान ३१ ऑक्टोबर २०२२ पासून सकाळी झेपावण्यास सुरुवात झाली होती. एअर इंडियाचे मुंबईचे विमानही सकाळीच आहे. त्यामुळे मुंबईला सायंकाळी जाण्यासाठी विमान उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. विशेषत: मुंबईहून औरंगाबाद येणाऱ्या प्रवाशांना अगदी पहाटे तीन वाजता उठून सकाळचे विमान गाठावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने सायंकाळच्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले. अखेर १ डिसेंबर २०२२ पासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळच्या वेळेस मुंबईसाठी इंडिगो कंपनीमार्फत विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेत मुंबईसाठी विमान होते; मात्र आता मार्चअखेर सायंकाळचे विमान बंद करण्याच्या हालचाली इंडिगोकडून सुरू आहेत. मुंबई विमानतळावर या सेवेसाठी उन्हाळी वेळापत्रकात स्लॉट मिळत नसल्याचे सांगितले जाते.

पाठपुरावा सुरूउन्हाळी वेळापत्रक अजून आलेले नाही; परंतु मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये या विमानाची बुकिंग होत नाही. सायंकाळी मुंबईसाठी विमानसेवा असावी, यासाठी एअर इंडिया आणि इतर एअरलाईन्सकडे पाठपुरावा सुरू आहे, असे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ