शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

प्रवास्यांना मोठा फटका! औरंगाबादहून मुंबईसाठी सायंकाळची विमानसेवा मार्चअखेर बंद होणार

By संतोष हिरेमठ | Updated: February 20, 2023 12:38 IST

प्रवासी, उद्योजक, पर्यटकांना बसणार फटका; विमानसेवा कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज

औरंगाबाद : मुंबईसाठी सायंकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची मुंबई- औरंगाबाद-मुंबई विमानसेवा मार्चअखेर बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी पुन्हा एकदा पहाटेच्या विमानसेवेवरच औरंगाबादकरांना अवलंबून राहावे लागेल. याचा उद्याेग, व्यावसायिक, पर्यटकांना मोठा फटका बसेल. त्यामुळे आमदार, खासदारांनी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

इंडिगोचे सायंकाळी उड्डाण घेणारे विमान ३१ ऑक्टोबर २०२२ पासून सकाळी झेपावण्यास सुरुवात झाली होती. एअर इंडियाचे मुंबईचे विमानही सकाळीच आहे. त्यामुळे मुंबईला सायंकाळी जाण्यासाठी विमान उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. विशेषत: मुंबईहून औरंगाबाद येणाऱ्या प्रवाशांना अगदी पहाटे तीन वाजता उठून सकाळचे विमान गाठावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने सायंकाळच्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले. अखेर १ डिसेंबर २०२२ पासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळच्या वेळेस मुंबईसाठी इंडिगो कंपनीमार्फत विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेत मुंबईसाठी विमान होते; मात्र आता मार्चअखेर सायंकाळचे विमान बंद करण्याच्या हालचाली इंडिगोकडून सुरू आहेत. मुंबई विमानतळावर या सेवेसाठी उन्हाळी वेळापत्रकात स्लॉट मिळत नसल्याचे सांगितले जाते.

पाठपुरावा सुरूउन्हाळी वेळापत्रक अजून आलेले नाही; परंतु मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये या विमानाची बुकिंग होत नाही. सायंकाळी मुंबईसाठी विमानसेवा असावी, यासाठी एअर इंडिया आणि इतर एअरलाईन्सकडे पाठपुरावा सुरू आहे, असे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ