शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दिव्यांग मुलगा झाला म्हणून पती सोडून गेला, २० वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:38 IST

सातत्याने पैशांची मागणी, सासऱ्याने पैसे देऊनही परतला नाही

छत्रपती संभाजीनगर : दिव्यांग मुलगा झाला म्हणून पत्नीला पती सोडून गेल्यानंतर तणावाखाली गेलेल्या २० वर्षीय निशाद खलील सय्यद या विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी रविवारी खलील रशीद सय्यद, सासरा रशीद हस्नोद्दीन सय्यद, दीर इलाही रशीद सय्यद, नणंद आशिफा शकील सय्यद, सय्यद शकील आणि शाकीर रशीद सय्यदविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मूळचा जालना तालुक्यातील सिंधी काळेगावचा असलेल्या २२ वर्षीय सय्यद खलीलसोबत निशादचे २ जुलै २०२१ रोजी लग्न झाले होते. विवाहानंतर काही महिन्यांनी पतीसह सासरच्यांनी तिला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैशांचा तगादा लावला. वडील अख्तर करीम बेग हे ट्रकचालक असल्याने मुलीने काही दिवस वडिलांना हे सांगितले नाही. मात्र, मारहाण सुरू झाल्यानंतर तिने प्रकार सांगितला. शेंद्रा एमआयडीसीत नोकरी लागल्यानंतर निशाद व तिचा पती शहरात राहण्यासाठी आले. मात्र, सासरकडील मंडळी तेथे येऊन छळ करीत असे. त्रासाला कंटाळून निशादने शुक्रवारी स्वयंपाकघरात गळफास घेतला.

फोनलाही प्रतिसाद नाही२०२२ मध्ये दिव्यांग मुलगा झाल्यावर तो पत्नीला एकटीला सोडून गेला. निशाद तेव्हापासून एकटीच राहत होती. जावयाने मुलीला चांगले वागवावे, या उद्देशाने निशादच्या वडिलांनी त्याला ४५ हजार रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही तो पुन्हा गावाकडे चालला गेला. निशाद सतत त्याला फोन करायची. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर १५ डिसेंबर रोजी तिने आयुष्य संपवले. आत्महत्येच्या ठिकाणी डायरीत उर्दूत सय्यद खलील सय्यद रशीद, पुढे मोबाइल क्रमांक व ए आरएच निगेटिव्ह असे लिहिले आहे. शिवाय, एसबीआयचा एक कॅन्सल्ड चेकदेखील आढळला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी