शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:52 PM

94th Akhil Bharatiy Marathi Sahitya Sanmelan : नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव संमेलनासाठी स्वीकारला

ठळक मुद्देकुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून साकारले आहे लोकहितवादी मंडळ १९५० साली स्थापन झाली नाशिक येथे स्थापना झालीनाशिक परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व कला विषयक काम

औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला मार्च अखेर होणार असल्याची घोषणा अ. भा. साहित्य महामंडळाचे  अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव संमेलनासाठी स्वीकारल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले. 

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळावे, यासाठी अखेरच्या टप्प्या दिल्ली आणि नाशिक अशी चुरस पाहायला मिळाली. मात्र अ. भा. साहित्य महामंडळाचे  अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिल्लीसाठी नकार असल्याचे संकेत दिल्याने संमेलन नाशिक येथेच होईल हे स्पष्ट झाले होते. साहित्य महामंडळाकडे दिल्ली, पुणे, अंमळनेर आणि नाशिक येथील लोकहितवादी मंडळ आणि अन्य एक अशी निमंत्रणे आली होती. यातच कोणत्याही  परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने साहित्य संमेलन घेणार नाही, अशी भूमिका ठाले पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मांडली होती. त्यामुळे साहित्य संमेलन होणार तर कुठे आणि कसे याची चर्चा सध्या साहित्य वर्तुळात रंगली होती. यातच दिल्लीच्या निमंत्रणावरून संजय नहार आणि ठाले पाटील यांच्यात आरोपप्रत्यारोप रंगले होते. मात्र, सर्व तर्कांना पूर्णविराम मिळत ठाले पाटील यांनी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव स्वीकारल्याचे जाहीर केले. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ठाले पाटील यांनी दिली.

कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून साकारले लोकहितवादी मंडळलोकहितवादी मंडळ ही संस्था कविवर्य कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून १९५० साली स्थापन झाली असून  नाशिक परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व कला विषयक काम करीत आहे. संस्थेचे विश्वस्त हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सचिव सुभाष पाटील, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी संमेलनासाठी निमंत्रण कार्यवाह दादा गोरे यांच्याकडे दिले होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य