जिल्हा बँकेकडून ९० टक्के पीकविमा
By Admin | Updated: July 11, 2016 00:24 IST2016-07-10T23:57:49+5:302016-07-11T00:24:29+5:30
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११२ शाखांमधून ९० टक्के पीकविम्याचे वाटप करण्यात आले आहे. ५५२ कोटींपैकी ५०० कोटींचे वाटप झाले असून, केवळ ५२ कोटींची रक्कम वाटपाअभावी राहिली आहे.

जिल्हा बँकेकडून ९० टक्के पीकविमा
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११२ शाखांमधून ९० टक्के पीकविम्याचे वाटप करण्यात आले आहे. ५५२ कोटींपैकी ५०० कोटींचे वाटप झाले असून, केवळ ५२ कोटींची रक्कम वाटपाअभावी राहिली आहे.
संयुक्त खाते तसेच बाहेरगावी असलेल्या शेतकऱ्यांचीच रक्कम वाटप झाली नाही. उर्वरित सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या पीकविम्याचे वाटप करण्यात आले आहे. संयुक्त खाते तसेच बाहेरगावी असणाऱ्या लाभार्थ्यांना बँक शाखेकडून संपर्क साधण्याचा प्रतत्न केला जात असल्याचे कार्यकारी संचालक एच.जे. जाधव यांनी सांगितले.