शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महावितरणाच्या औरंगाबाद विभागात ८७००० शेतकऱ्यांना हवीय वीज जोडणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 19:19 IST

मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही.

ठळक मुद्दे विहिरी, बोअरवेलमध्ये पाणी आहे; पण केवळ वीज जोडणी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक व फळबागा जळून गेल्या

- विजय सरवदे 

औरंगाबाद : कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून महावितरणकडे रीतसर पैसे भरले आहेत; परंतु मराठवाड्यातील ६७ हजार ३७४ शेतकरी, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही. विहिरी, बोअरवेलमध्ये पाणी आहे; पण केवळ वीज जोडणी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक व फळबागा जळून गेल्या. 

प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता याव्यात, शेती उत्पादनात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त करून देता यावे, यासाठी शासनाने अनेक योजनांच्या घोषणा केल्या; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्यच. अलीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अनियमित, तर काही जिल्ह्यांत अपुरा पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून विहिरी खोदल्या. बोअरवेल घेतल्या. त्यासाठी महावितरणकडे कोटेशन व पैसेही भरले; पण मार्च २०१६ पासून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. वीज जोडणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक निवेदने दिली. 

महावितरणचे उंबरठे झिजविले; तेव्हा प्रादेशिक कार्यालयांतर्गत ११ जिल्ह्यांमधील कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे ११ हजार ६९८ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यामुळे तारा नाहीत. पोल नाहीत. डीपी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी नाही, असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. 

प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील ८ व उत्तर महाराष्ट्रातील ३, अशी ११ जिल्हे येतात. प्रादेशिक कार्यालयांतर्गत वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ८५२ शेतकरी, जालना जिल्ह्यात १२ हजार ९८० शेतकरी, परभणी जिल्ह्यात ४ हजार ७६५ शेतकरी, हिंगोली जिल्ह्यात ५ हजार ५२९ शेतकरी, नांदेड जिल्ह्यात ७ हजार ७५१ शेतकरी, बीड जिल्ह्यात १० हजार ४७३ शेतकरी, लातूर जिल्ह्यात ६ हजार २१८ शेतकरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ८०६ शेतकरी, तर धुळे जिल्ह्यात ५ हजार ९४० शेतकरी, जळगाव जिल्ह्यात ९ हजार ९२३ शेतकरी आणि नंदूरबार जिल्ह्यात ४ हजार २४७ शेतकरी, असे एकूण ८७ हजार ४८४ शेतकरी आहेत. 

आणखी ४-५ महिने प्रतीक्षा करावी लागेलया संदर्भात महावितरणच्या औरंगाबाद झोनचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, मराठवाडा पॅकेजचा निधी संपला आहे. त्यामुळे औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत या पॅकेज अंतर्गत वीज जोडणी देण्याचे काम थांबले आहे. कृषिपंपांसाठी वीज जोडणी मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना नवीन योजनेंतर्गत वीज जोडणी दिली जाणार आहे. यासाठी आणखी चार-पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रelectricityवीज