शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

छाप्यात ८,४०० लिटर रॉकेल केले जप्त

By admin | Updated: August 13, 2015 00:22 IST

नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते.

नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील इटकळ शिवारातील एका शेडमध्ये रेशनचे धान्य आणि रॉकेलचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी सदरील शेडवर छापा मारला असता दोनशे लिटरचे तब्बल ४२ बॅरल रॉकेल (८४०० लिटर), ५० किलो वजानाचे ६० कट्टे गहू आणि ५२ कट्टे तांदूळ आढळून आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस मालाचे नमुने, वजन-मापे घेत होते. या प्रकरणी तुळजापूर ठाण्याचे सपोनि किरण दामोदर दांडगे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रज्जाक कचरू पठाण (रा. काटगाव) व जावेद महेबूब नदाफ (रा. केशेगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उपरोक्त दोघांनाही तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि फुलचंद मेंगडे हे करीत आहेत. (वार्ताहर) शासनाच्या निकषानुसार प्रति कार्ड दोन लिटर या प्रमाणे पोलिसांनी जप्त केलेले ८४०० लिटर रॉकेल हे किमान ४ हजार २०० लाभार्थ्यांचे आहे. ३००० किलो गहू हे एक हजार युनिटधारकांचे आहे. तर २९०० किलो तांदूळ हा १ हजार ३०० युनिटधारकांचा आहे. त्यामुळे उपरोक्त साठा करून ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून जोर धरू लागली आहे.