शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गादीया विहार, पडेगाव येथे आढळले ८०० नळ अनधिकृत; महापालिका लवकरच करणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 14:51 IST

एका वॉर्डात किमान एक ते दीड हजार अनधिकृत नळ असतील, असा कयास आहे

औरंगाबाद: मुख्य जलवाहिन्यांवर शेकडो अनधिकृत नळ घेण्यात आल्याने, अनेक वसाहतींना पाणीपुरवठाच होत नाही. ज्या भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, तेथील मुख्य जलवाहिनीची तपासणी मनपाच्या विशेष पथकाकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी गादीया विहार, त्रिशरण चौक आणि पडेगाव भागात सर्वेक्षण करण्यात आले. तिन्ही ठिकाणी तब्बल ८०० पेक्षा अधिक अनधिकृत नळ आढळले. लवकरच तेथे कारवाई होईल, असे पथक प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.

महापालिकेच्या रेकॉर्डवर फक्त १ लाख ३५ हजार अधिकृत नळ आहेत. अनधिकृत नळांची संख्या दीड ते दोन लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. राजकीय मंडळींनी मतांसाठी अनधिकृत नळ घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर येत आहे. एका वॉर्डात किमान एक ते दीड हजार अनधिकृत नळ असतील, असा कयास आहे. बहुतांश नळ मुख्य जलवाहिन्यांवरून घेण्यात आले. त्यामुळे सर्वाधिक वेळ पाणी या नागरिकांना मिळत आहे. शेवटच्या वसाहतीपर्यंत किंवा गल्लीपर्यंत पाणी जात नाही. मागील काही दिवसांपासून मनपाकडे कमी दाबाने, पाणी येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने प्राप्त होत आहेत. या तक्रारीची शहनिशा विशेष पथकाकडून करण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वीच भावसिंगपुरा, नवयुग कॉलनी भागातील अनधिकृत नळ कापण्यात आले होते. शुक्रवारी मनपाच्या विशेष पथकाने शहानुरमियाँ दर्गा परिसरातील गादीया विहार, त्रिशरण चौक आणि पडेगाव भागात पाहणी केली. तिन्ही ठिकाणी ८०० पेक्षा अधिक नळ मुख्य जलवाहिन्यांवरून घेतल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी अनधिकृत नळही आहेत.

कारवाई तर होणारचमहापालिका शनिवारी किंवा रविवारी अनधिकृत नळ खंडित करण्याची मोहीम राबविणार आहे. नळ खंडित केल्यावर पाइपही जप्त केला जाईल. नागरिकांनी रितसर अर्ज करून मनपाकडून अधिकृत नळ घ्यावा. ज्या पद्धतीने मुख्य जलवाहिन्यांची चाळणी करण्यात आली आहे, हे शहरासाठी योग्य नाही.- संतोष वाहुळे, विशेष पथक प्रमुख.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी