शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदारसंघात दोन वर्षात ८०० कोटींची विकासकामे; पाच वर्षात विरोधकांनी काय दिवे लावले?

By बापू सोळुंके | Updated: November 13, 2024 19:41 IST

जनतेचे प्रश्न, उमेदवारांचे उत्तर: गेली तीन टर्म संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलो, याचा फायदा जनतेला झाला. कारण गेल्या अडीच वर्षात मतदारसंघात ८०० कोटींची विकासकामे करता आली. विरोधक फक्त गप्पा मारतात. त्यांनी काय दिवे लावले ते सांगावे, असे आव्हानच शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

गेली तीन टर्म संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांना शिंदेसेनेचे प्रवक्ते पद मिळाले. शिरसाट यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने महिनाभरापूर्वी त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- पंधरा वर्षांपासून तुम्ही पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व करत आहात. तुम्ही केलेली दोन मोठी कामे सांगा?उत्तर- पश्चिम मतदारसंघातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बीड बायपास आणि गोलवाडी रस्त्याची कामे करता आली. या रस्त्यांमुळे बायपासवर घडणारे अपघात थांबले, परिसराचा झपाट्याने विकास होत आहे.

प्रश्न- तुम्ही मुंबईत घर घेतल्यामुळे अनिवासी आमदार आहात, असा आरोप होतो आहे. त्याचे काय?उत्तर- मुंबईत आमचे मूळ घर आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी कोणी सोडून देते का? ज्यांना मतदारसंघ कसा आहे, हे माहिती नाही, ते असे प्रश्न विचारतात, अशा लोकांबद्दल काय बोलावे.

प्रश्न- शहराचा पाणी प्रश्न मागील ३० वर्षांपासून रखडला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी का पुढाकार घेतला नाही?उत्तर- शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन राज्य सरकारने मंजूर केले आहे. यामुळे नव्या योजनेचे पाणी तीन महिन्यात शहरवासीयांना मिळणार आहे. शहराला दीड वर्ष पाणीपुरवठा होणार नसल्याचा विरोधी पक्षाच्या आरोपात तथ्य नाही.

प्रश्न- उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला आमदार केले. त्यांचीच साथ सोडल्यामुळे तुमच्यावर गद्दारीचा आरोप होतोय?उत्तर- मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता, आम्हाला निष्क्रिय आमदार म्हणून हिणवले जात होते. यामुळेच आम्ही उठाव केला. मागील अडीच वर्षात झालेली विकासकामे पाहून आमची भूमिका योग्यच होती हे आता जनतेला पटले आहे.

प्रश्न- उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान, असे विधान तुम्ही केले होते. म्हणजे कसे ते स्पष्ट करा?उत्तर- पूर्व आणि मध्य मतदारसंघात एमआयएमला मदत करून त्या बदल्यात ते एमआयएमची पश्चिममध्ये मदत घेत आहे. यामुळे उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान करण्यासारखे असल्याचे विधान योग्यच आहे.

प्रश्न-केवळ दोन वर्षातच कामे केली, मग इतके दिवस काय केले, या आरोपाचे काय?उत्तर-आमच्यासारख्या आमदारांना निधी मिळत नव्हता, यामुळेच आम्हाला उठाव करावा लागला. उठाव केल्यानंतर मागील दोन वर्षात भरघोस निधी मिळाला आणि विकासकामे करू शकलो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमSanjay Shirsatसंजय शिरसाट