शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

मतदारसंघात दोन वर्षात ८०० कोटींची विकासकामे; पाच वर्षात विरोधकांनी काय दिवे लावले?

By बापू सोळुंके | Updated: November 13, 2024 19:41 IST

जनतेचे प्रश्न, उमेदवारांचे उत्तर: गेली तीन टर्म संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलो, याचा फायदा जनतेला झाला. कारण गेल्या अडीच वर्षात मतदारसंघात ८०० कोटींची विकासकामे करता आली. विरोधक फक्त गप्पा मारतात. त्यांनी काय दिवे लावले ते सांगावे, असे आव्हानच शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

गेली तीन टर्म संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांना शिंदेसेनेचे प्रवक्ते पद मिळाले. शिरसाट यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने महिनाभरापूर्वी त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- पंधरा वर्षांपासून तुम्ही पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व करत आहात. तुम्ही केलेली दोन मोठी कामे सांगा?उत्तर- पश्चिम मतदारसंघातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बीड बायपास आणि गोलवाडी रस्त्याची कामे करता आली. या रस्त्यांमुळे बायपासवर घडणारे अपघात थांबले, परिसराचा झपाट्याने विकास होत आहे.

प्रश्न- तुम्ही मुंबईत घर घेतल्यामुळे अनिवासी आमदार आहात, असा आरोप होतो आहे. त्याचे काय?उत्तर- मुंबईत आमचे मूळ घर आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी कोणी सोडून देते का? ज्यांना मतदारसंघ कसा आहे, हे माहिती नाही, ते असे प्रश्न विचारतात, अशा लोकांबद्दल काय बोलावे.

प्रश्न- शहराचा पाणी प्रश्न मागील ३० वर्षांपासून रखडला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी का पुढाकार घेतला नाही?उत्तर- शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन राज्य सरकारने मंजूर केले आहे. यामुळे नव्या योजनेचे पाणी तीन महिन्यात शहरवासीयांना मिळणार आहे. शहराला दीड वर्ष पाणीपुरवठा होणार नसल्याचा विरोधी पक्षाच्या आरोपात तथ्य नाही.

प्रश्न- उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला आमदार केले. त्यांचीच साथ सोडल्यामुळे तुमच्यावर गद्दारीचा आरोप होतोय?उत्तर- मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता, आम्हाला निष्क्रिय आमदार म्हणून हिणवले जात होते. यामुळेच आम्ही उठाव केला. मागील अडीच वर्षात झालेली विकासकामे पाहून आमची भूमिका योग्यच होती हे आता जनतेला पटले आहे.

प्रश्न- उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान, असे विधान तुम्ही केले होते. म्हणजे कसे ते स्पष्ट करा?उत्तर- पूर्व आणि मध्य मतदारसंघात एमआयएमला मदत करून त्या बदल्यात ते एमआयएमची पश्चिममध्ये मदत घेत आहे. यामुळे उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान करण्यासारखे असल्याचे विधान योग्यच आहे.

प्रश्न-केवळ दोन वर्षातच कामे केली, मग इतके दिवस काय केले, या आरोपाचे काय?उत्तर-आमच्यासारख्या आमदारांना निधी मिळत नव्हता, यामुळेच आम्हाला उठाव करावा लागला. उठाव केल्यानंतर मागील दोन वर्षात भरघोस निधी मिळाला आणि विकासकामे करू शकलो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमSanjay Shirsatसंजय शिरसाट