शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:32 IST

तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांतून शहरात नारळ आणले जातात.

छत्रपती संभाजीनगर : ’रामदूत अतुलित बल धामा, अंजनि-पुत्र पवनसूत नामा’... अशा बलशाली श्रीरामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव मंगळवारी (दि.२३) साजरा करण्यात येणार आला. वर्षभरात सर्वाधिक नारळ हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विक्री होत असतात. दिवसभरात जिल्ह्यात सुमारे ७.५० लाख नारळ भगवान हनुमानाच्या मूर्ती समोर फुटले , असा अंदाज मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी उलाढालीवरून वर्तविला आहे.

तीन राज्यांतून आले ३० ट्रक नारळतामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांतून शहरात नारळ आणले जातात. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भाविक नारळ खरेदी करीत असले तरी याची उलाढाल होलसेल मार्केटमध्ये गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. किरकोळ विक्रेते आपल्याकडे नारळाचा साठा करून ठेवतात. गुढीपाडव्यापासून ते हनुमान जन्मोत्सवाच्या आदल्या दिवसापर्यंत ३० मालट्रक भरून नारळाचा पुरवठा झाला आहे. एका ट्रकमध्ये २५ हजार नारळ येतात. असे ७ लाख ५० हजार नारळ आणण्यात आले व होलसेल विक्रीत तेवढे नारळ आतापर्यंत विकले गेले आहेत.

पाणीदार नारळालाच मागणीराज्यात नारळ उत्पादन यंदा ३० टक्कांनी कमी झाले आहे. यामुळे शेकड्यामागे १५० रुपयांनी भाव वाढले आहे. गुढीपाडव्याआधी १४०० ते १५०० रुपये शेकडा विक्री होणारे नारळ सध्या १५५० ते १६०० रुपयांपर्यंत विकत आहेत. किरकोळ विक्रीत मंदिरासमोर २० ते २५ रुपयांनी विक्री होईल. देवासमोर फोडण्यासाठी पाणीदार नारळलाच मागणी असते.

पाच दिवसांच्या आत नारळ फोडासध्या उन्हाचा पारा वाढत आहे. कडक उन्हामुळे नारळातील पाणी कमी होते. साधारणत: पाच दिवसांनंतर नारळातील पाणी सुकते. यामुळे नारळाचा वापर पाच दिवसाच्या आतच करावा, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.

हनुमान जन्मोत्सव व पोळ्याला विकतात सर्वाधिक नारळव्यापाऱ्यांनी सांगितले की, वर्षभरात दोन सणाला सर्वाधिक नारळाची विक्री होते. त्या हनुमान जन्मोत्सव व पोळ्याचा दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी नारळ विकताच त्याशिवाय प्रत्येक गावात याच काळात यात्रा भरत असते. त्या यात्रेत नारळाची उलाढाल मोठी होत असते.

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीAurangabadऔरंगाबाद