शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७५० कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:50 IST

प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, उजवा कालवा अनेक ठिकाणी खराब स्थितीत असल्याने पिकांसाठी सोडलेल्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य असेल. यासाठी ७५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जायकवाडीच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कधी उपलब्ध करून दिला जाईल, यावर बोलताना विखे म्हणाले, ७५० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. जायकवाडीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. भावली योजनेला स्थगिती देणार काय, ८० टक्के काम होत आले आहे. धोरणाच्या विरोधात ते काम आहे, यावर विखे म्हणाले, त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

कोकण विभाग करणार सर्वेक्षणगोदावरी खोऱ्यात असणाऱ्या ६० टीएमसी पाण्यासाठी या भागात नदीजोड प्रकल्प राबविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्या योजनेच्या डीपीआरसाठी ६४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. तसेच सर्वेक्षणाचे काम कोकण विभागाला दिले असून, त्याचे कामही सुरू झाले आहे, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

पाणी कमी होणार नाहीजायकवाडीची साठवण क्षमता ६० वरून ५८ वर आणण्याची शिफारस अभ्यास गटाने केली. यावर शासनाची भूमिका काय, यावर विखे म्हणाले, मी मंत्री होण्यापूर्वी हा अहवाल सादर झालेला आहे. त्यामुळे मेंढीगिरी समितीने कोणत्या निकषानुसार, कोणत्या आकडेवारीवरून ६० टक्के पाणी ठेवण्याचे निश्चित केले होते आणि अभ्यास गटाने कोणते निकष वापरले, याची माहिती घेत आहे. प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलWaterपाणी