शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७५० कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:50 IST

प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, उजवा कालवा अनेक ठिकाणी खराब स्थितीत असल्याने पिकांसाठी सोडलेल्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य असेल. यासाठी ७५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जायकवाडीच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कधी उपलब्ध करून दिला जाईल, यावर बोलताना विखे म्हणाले, ७५० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. जायकवाडीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. भावली योजनेला स्थगिती देणार काय, ८० टक्के काम होत आले आहे. धोरणाच्या विरोधात ते काम आहे, यावर विखे म्हणाले, त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

कोकण विभाग करणार सर्वेक्षणगोदावरी खोऱ्यात असणाऱ्या ६० टीएमसी पाण्यासाठी या भागात नदीजोड प्रकल्प राबविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्या योजनेच्या डीपीआरसाठी ६४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. तसेच सर्वेक्षणाचे काम कोकण विभागाला दिले असून, त्याचे कामही सुरू झाले आहे, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

पाणी कमी होणार नाहीजायकवाडीची साठवण क्षमता ६० वरून ५८ वर आणण्याची शिफारस अभ्यास गटाने केली. यावर शासनाची भूमिका काय, यावर विखे म्हणाले, मी मंत्री होण्यापूर्वी हा अहवाल सादर झालेला आहे. त्यामुळे मेंढीगिरी समितीने कोणत्या निकषानुसार, कोणत्या आकडेवारीवरून ६० टक्के पाणी ठेवण्याचे निश्चित केले होते आणि अभ्यास गटाने कोणते निकष वापरले, याची माहिती घेत आहे. प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलWaterपाणी