६८ पाणंद रस्ते केले मोकळे

By Admin | Updated: December 23, 2015 23:35 IST2015-12-23T23:29:11+5:302015-12-23T23:35:46+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत एकूण १९१ पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून त्यापैकी ६८ पाणंद रस्ते महाराजस्व अभियानात मोकळे करण्यात आले आहेत.

68 road roads are free | ६८ पाणंद रस्ते केले मोकळे

६८ पाणंद रस्ते केले मोकळे

हिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत एकूण १९१ पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून त्यापैकी ६८ पाणंद रस्ते महाराजस्व अभियानात मोकळे करण्यात आले आहेत. मात्र शंभरावर पाणंद रस्ते अजूनही मोकळे होणे बाकी आहेत.
गाव नकाशाप्रमाणे नोंदी असलेले अनेक पाणंद, शेत, शिव रस्ते अतिक्रमणांमुळे बंद झालेले आहेत. याबाबत ग्रामस्थ तहसील कार्यालयात वारंवार तक्रारी करीत असतात. शेतरस्त्यांचे वाद तर अनेकदा समोर येतात. प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार अशा १९१ रस्त्यांवर अतिक्रमण केले असून त्यांची एकूण लांबी २३४ किमी आहे. यात हिंगोली तालुक्यातील ३0 अतिक्रमित रस्त्यांची लांबी ३५ किमी, वसमतमध्ये ११ रस्ते असून लांबी २४ किमी, कळमनुरीत ९७ रस्त्यांची लांबी १0५ किमी, औंढ्यात ५ रस्त्यांची लांबी ८ किमी, सेनगावात ४८ रस्त्यांची लांबी ६२ किमी एवढी आहे.
यापैकी ६८ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविले असून त्याची लांबी १0६ किमी एवढी आहे. अतिक्रमण हटवून मोकळे करण्यात आलेल्यांमध्ये हिंगोलीत ७ रस्त्यांची लांबी ६.९ किमी, वसमतमध्ये ४ रस्त्यांची लांबी ७ किमी, कळमनुरीत ३0 रस्त्यांची लांबी ५५ किमी, औंढ्यात २ रस्त्यांची लांबी ३.७ किमी तर सेनगावात २५ रस्त्यांची लांबी ३४ किमी आहे.अनेक जिल्ह्यांमध्ये महाराजस्व अभियानात अतिक्रमित पाणंद, शेतरस्ते मोकळा श्वास घेत आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यात गावकीच्या वादात अनेक कामे अडली आहेत. त्यात प्रशासनाने गावबैठका घेवून यात लक्ष घातले तर अनेक ठिकाणचे वाद मिटविणे शक्य होणार आहे. शिवाय अशा रस्त्यांचे महत्त्व पटवून दिले तर काही ठिकाणी लोकसहभागातून ही कामे करणे शक्य आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 68 road roads are free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.