शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

६१५२ विहिरींची कामे अपूर्ण

By admin | Updated: May 23, 2014 00:20 IST

उस्मानाबाद : रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विहिरींची कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र यातील तब्बल ६ हजार १५२ विहिरीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत.

 उस्मानाबाद : रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विहिरींची कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र यातील तब्बल ६ हजार १५२ विहिरीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधानपरिषदेत उपस्थित केला होता. याअनुषंगाने राज्याच्या अवर सचिवांनी जिल्ह्यातील अपुर्ण विहिरींचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली आहे. यामध्ये अलीकडच्या काळात विहीरींच्या कामाचाही समावेश करण्यात आला आहे. हाताला काम देतानाच सिंचनक्षेत्र वाढून दुष्काळी भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा असा यामागे हेतू आहे. मात्र प्रशासनाने ही बाब फारशी गांर्भीयाने घेतली नसल्याचेच अपूर्ण विहीरींच्या कामाची आकडेवारी पाहिली असता दिसून येते. मंजूर कामांपैकी प्रशासनाला केवळ २ हजार १३७ कामे पूर्ण करता आली. या अनुषंगाने आ. सतीश चव्हाण व इतर विधानपरिषद सदस्यांनी विधानपरिषदेत याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश रोहयो विभागाला दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्टÑीय रोजगार हमी योजनेव्दारे हाती घेण्यात आलेल्या विहिरीसाठी निधी उपल्बध असतानाही विहिरींची कामे मोठया प्रमाणात अपूर्ण आहेत, हे खरे काय आहे काय, तसे असल्याच या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशी केली असल्यास त्यात काय आढळून आले व सदर विहिरीची कामे तातडीने पूर्ण करणेबाबत शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश अवर सचिव वि.पु काळे यांनी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यतील विविध ग्रामपंचायती स्तरावर विविध विहिरींच्या ८ हजार २९९ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ३३९, तुळजापूर ९२०, उमरगा ८८५, लोहारा २०२, भूम २ हजार ३४९, परंडा १ हजार ६४, कळंब १ हजार ६१७ तर वाशी तालुक्यातील ९२३ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत यातील एकही काम सुरु झालेले नाही. उस्मानाबाद तालुक्यात २८५, तुळजापूर ११३६, उमरगा ६९४, लोहारा ११६, भूम ८०४, परंडा १ हजार ४९९, कळंब ९७८ तर वाशी ६४२ असे जिल्ह्यात ६ हजार १५४ विहिरीची कामे अपूर्ण आहेत. तर मागील काही काळात प्रशासनाच्या वतीने केवळ २ हजार १३७ विहीरीचे कामे पूर्ण केली असून त्यात उस्मानाबाद ११४, तुळजापूर ३०३, उमरगा १०९, लोहारा ८२, भूम ३८३, परंडा ५०, कळंब १०४४ तर वाशी तालुक्यातील ५२ अशा २ हजार १३७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.