शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

६० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले, आता हमीभावाचा काय फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 19:48 IST

इकडे खरेदी केंद्राचे शटरही उघडले नाही

छत्रपती संभाजीनगर : २५ ते ३० टक्के ओलावा असताना आम्ही सोयाबीन विकले. त्यावेळी दसऱ्यादरम्यान शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले असते तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता केंद्र सरकारने १५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमी भावाने खरेदी करा, असे आदेश दिले. दुसरीकडे अजूनही खरेदी केंद्राचे शटर उघडले नाही. ६० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले, आता आदेशाचा काय फायदा?’ असा प्रश्न गोपालपूर येथील सुरेश वडेकर या शेतकऱ्याने उपस्थित केला.

जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी मका विक्रीसाठी शेतकरी आले होते. यातील अनेकांना मका विकून गव्हाची पेरणी करायची आहे. १५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करा, असा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश रविवारी जाहीर करण्यात आला. यात सर्व प्रकारच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांनी केले. पण हा निर्णय दसऱ्याच्या काळात घेतला असता तर सोयाबीन उत्पादकांना फायदा झाला असता, असेही त्यांनी नमूद केले.

आडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले, शेतकऱ्यांनी सुरुवातील ३० टक्के ओलसर सोयाबीन ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विकले. आता बाजारात १८ ते १९ टक्के ओलसर असलेले सोयाबीन ३५०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.

...तरच शिल्लक सोयाबीनला फायदाकेंद्र सरकारने सोयाबीनला हमीभाव ४ हजार ८१२ रुपये दिला आहे. शेतकऱ्यांना गहू पेरणीसाठी रक्कम हवी. अजूनही निम्म्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी लवकर शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे.- लालाजी वडेकर, शेतकरी, गोपालपूर

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarket Yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी