६0 वसाहतींना सहा दिवसांनी मिळणार पाणी

By Admin | Updated: February 17, 2015 00:42 IST2015-02-17T00:27:58+5:302015-02-17T00:42:53+5:30

औरंगाबाद : पाण्याचे टँकर वसाहतींमध्ये पुरविण्यात येईल. टँकर सेवेवर महावितरणच्या शटडाऊनचा काहीही परिणाम होणार नाही, असेही कंपनीने कळविले आहे.

60 colonies get water after six days | ६0 वसाहतींना सहा दिवसांनी मिळणार पाणी

६0 वसाहतींना सहा दिवसांनी मिळणार पाणी


औरंगाबाद : पाण्याचे टँकर वसाहतींमध्ये पुरविण्यात येईल. टँकर सेवेवर महावितरणच्या शटडाऊनचा काहीही परिणाम होणार नाही, असेही कंपनीने कळविले आहे.
या वसाहतींना सहा
दिवसांनी पाणी..
‘अ’ प्रभागातील भुजबळनगर, पडेगाव, ‘क’ प्रभागातील हमजा मशीद, डी.पी.रोड, पहेलवान गल्ली, सदाफ कॉलनी, एस. टी. कॉलनी, गुलमंडी, गादिया पार्क, भवानीनगर, निजामगंज, जाफरगेट, मुजीब कॉलनी, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, शरीफ कॉलनी, ‘ड’ प्रभागातील बन्सीलालनगर, पदमपुरा, उस्मानपुरा, श्रेयनगर, काल्डा कॉर्नर, चेतनानगर, सिंधी कॉलनी, भोईवाडा, गांधीनगर, सहारा प्राईड, श्रीनिकेतन कॉलनी, रोकडिया हनुमान कॉलनी, रमानगर, ‘फ’ प्रभागातील कबीरनगर, मिलिंदनगर, गाडगेनगर, मुरलीधरनगर, नागसेननगर, एमआयडीसी कॉलनी, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर, तारामती भवन, शहानूरवाडी, प्रतापनगर, शम्सनगर, ‘ई’ प्रभागातील पुंडलिकनगर ईएसआर, म्हाडा, मूर्तिजापूर, जयभवानीनगर, संतोषीमातानगर, मुुकुंदवाडी गाव, ‘ब’ प्रभागातील एन-१२ छत्रपतीनगर, रोझाबाग, हॉटेल ताज, एन-१२ दिल्लीगेट, अल्मीन सोसायटी, सुरेवाडी, एन-९, भारतमातानगर, ब्रिजवाडी.४
वरील वसाहतींना दोन दिवसाआडच्या वेळा पत्रकानुसार १७ रोजी पाणीपुरवठा होणार आहे. २० फेबु्रवारी रोजी या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक आहे. परंतु त्या दिवशी महावितरण शटडाऊन घेणार आहे. त्यामुळे या वसाहतींना पाणीपुरवठा होणार नाही. २३ फेबु्रवारी रोजी त्या वसाहतींना दोन दिवसांआडच्या वेळेनुसार पाणीपुरवठा होईल, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

Web Title: 60 colonies get water after six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.