शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५७ पाकिस्तानी नागरिकांचे लाँग टर्म व्हिसावर वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:37 IST

लाँग टर्म व्हिसा म्हणजे काय? कोणाला मिळतो हा व्हिसा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या ५७ पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करीत आहेत. हे सर्व नागरिक प्रदीर्घ व्हिसावर वास्तव्यास आहेत. यातील अनेक जण वैवाहिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारणांतून पाकिस्तानातून आले आहेत. केंद्र सरकारकडून अद्याप या लाँग टर्म व्हिसाबाबत निर्णय न झाल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात सहभागी झालेले दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर भारत- पाकिस्तान संबंधांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला. त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचा आदेश जारी केला. त्यानंतर जिल्हा पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांकडून प्रत्येकाच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू करण्यात आली. त्यांच्याकडील वैध कागदपत्रे, व्हिसाची मुदत, वास्तव्यास असल्याचे कारण, भारतातील संबंध यासंदर्भात सखोल तपास करण्यात येत आहे.

लाँग टर्म व्हिसा म्हणजे काय?लाँग टर्म व्हिसा म्हणजे भारतात दीर्घकालीन वास्तव्यासाठी केंद्र शासनाची परवानगी मिळवली जाते. प्रामुख्याने पाकिस्तानातील हिंदू, शीख, ख्रिश्चन व बौद्ध अल्पसंख्याक यांना ही बाब लागू होते.

शहरात ५२ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य होते. २०२४ मध्ये त्यात वाढ होऊन तो आकडा ५७ पर्यंत पोहोचला. यात १७ मुस्लिम, तर ४० हिंदू नागरिक आहेत. त्यांची प्राथमिक चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यांच्याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. याव्यतिरीक्त गेल्या काही महिन्यांमध्येदेखील एकही पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPakistanपाकिस्तान