शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ५५ टक्के; जॅकवेल, मुख्य जलवाहिन्यांच्या कामांनी घेतली गती

By मुजीब देवणीकर | Updated: November 2, 2023 16:05 IST

शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहराची लोकसंख्या २०५० मध्ये किती राहील, हे गृहीत धरून २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. अनेक अडथळ्यांनंतर योजनेच्या विविध कामांनी आता चांगलीच गती घेतली आहे. आतापर्यंत योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. याच गतीने काम सुरू राहिल्यास डिसेंबर २०२४ मध्ये योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत वारंवार याेजनेचा आढावा घेत आहेत. जायकवाडी धरणात जॅकवेल उभारण्यासाठी कॉफरडॅम उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या भिंती उभारण्याचे काम सुरू होईल. धरणाच्या पायथ्याशी खडक लागल्याने ब्रेकरच्या साह्याने काम सुरू करण्यात आले. या ठिकाणी ब्लास्टिंगला परवानगी नसल्याने खडक फोडण्यासाठी यंत्रणा वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. दररोज दोन ते तीन जलवाहिन्यांना वेल्डिंग केली जात होती. आता हे प्रमाण तब्बल ७ पर्यंत नेण्यात आले. त्यामुळे २२ किमीपेक्षा अधिक अंतरावर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. पुढील ८ किमीसाठी पाइपही आणून ठेवण्यात आले. काही ठिकाणी मनपाच्या ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचा अडथळा येतोय. किंचितही धक्का लागला तर दोन्ही वारंवार फुटून शहराचा पाणीपुरवठा ठप्प होत असल्याने अत्यंत सावधगिरीने काम करावे लागत असल्याचे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र गोगलोतू यांनी सांगितले.

शहरात १८०० किमीच्या जलवाहिन्याशहरामध्ये १८०० किमीच्या जलवाहिन्या टाकायच्या आहेत. त्यालाही गती दिली असून, दररोज दोन ते अडीच किमी. जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. नक्षत्रवाडी येथे सहा जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यांतील तीन पूर्ण झाली असून, उर्वरित केंद्रांचे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले.

मनपाचे जलकुंभाकडे लक्षनवीन पाणीपुरवठा योजनेत तयार करण्यात आलेले जलकुंभ हस्तांतरण करून घेणे, त्याचा त्वरित वापर सुरू करण्यावर मनपा प्रशासनाने भर दिला आहे. उन्हाळ्यापूर्वी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण येईल. शहरात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी येईल. तूर्त ७०० मिमीची जुनी जलवाहिनी काही दिवस सुरू ठेवण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यातशहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत. ११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यात असून, आंध्र प्रदेशातील मजुरांकडून रखडलेल्या जलकुंभांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी नमूद केले की, ४० मजुरांची पहिली तुकडी दाखल झाली आहे. त्यामुळे तीन जलकुंभांची कामे लगेचच सुरू होतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी