शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

उस्मानाबाद जिल्ह्यातील ५१ प्रकल्पांमध्ये ठणठणाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 19:42 IST

प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना सध्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसागणिक टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.

ठळक मुद्दे९९ तलाव जोत्याखाली३६ प्रकल्पांमध्ये २५ टक्केच साठा

उस्मानाबाद : जिल्ह्यात अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ४० ते ४२ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे प्रकल्पांची पाणी पातळीही फारशी उंचावली नव्हती. परिणामी हिवाळ्यातच प्रकल्पांच्या घश्याला कोरड पडू लागली आहे. आजघडीला जिल्हाभरातील सुमारे ५१ प्रकल्पांमध्ये ठणठणाट निर्माण झाला आहे. तर ९९ तलाव जोत्याखाली गेले आहेत. परिणामी सदरील प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना सध्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसागणिक टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात लहान, मोठ्या व मध्यम प्रकल्पांची संख्या साधापणे २२३ एवढी आहे. गतवर्षी जिल्हाभरात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा होता. परंतु, यंदा वार्षिक सरासरीच्या अल्प पाऊस पडला. परिणामी जिल्हाभरातील लघु, मध्यम तसेच मोठे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले नाही. ज्या प्रकल्पांमध्ये थोडाबहुत साठा झाला आहे, तोही झपाट्याने कमी होऊ लागला आहे. आजघडीला एकाही प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उरलेला नाही. १०० ते ७५ टक्क्यांदरम्यान साठा असलेल्या प्रकल्पांची संख्या अवघी सहा एवढी आहे. अशीच अवस्था पन्नास टक्क्यांवर साठा असलेल्या प्रकल्पांची आहे.

एक मध्यम आणि १० लघु प्रकल्पांतच ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान साठा उरला आहे. २६ ते ५० टक्क्यांदरम्यान दोन मध्यम आणि १८ लाघु प्रकल्पांमध्ये साठा आहे. २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेल्या प्रकल्पांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. आजघडीला ही संख्या ३६ च्या आसपास जावून ठेपली आहे. तर ९९ प्रकल्पांची पाणीपातळी ज्योत्याखाली गेली आहे. ज्यामध्ये चार मध्यम प्रकल्प, १ मोठा प्रकल्प आणि ९४ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान, प्रकल्प कोरडे पडण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढू लागले आहे. तीन मध्यम आणि ४८ लघु असे एकूण ५१ प्रकल्पांच्या घश्याला कोरड पडली आहे. त्यामुळे या गावांवर अवलंबून असेल्या ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भविष्यात ही परिस्थिती आणखी विदारक होईल, असे पाटबंधारे विभागातील अधिका-यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.मध्यम प्रकल्पांतील साठा चिंताजनक

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची संख्या साधारपणे १७ एवढी आहे. आजघडीला रूई, वाघोली, रायगव्हाण, खासापूर, चांदणी, खंडेश्वर, साकत या प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठाही उरलेला नाही. तर उर्वरित प्रकल्पांतील उपयुक्त साठाही चिंताजनक अवस्थेत आहे. तेरणा प्रकल्पांमध्ये १.५३८ दलघमी, बाणगंगा प्रकल्पात २.०१७, रामगंगा ०.५६३, संगमेश्वर ०.१९९, कुरनूर ४.८३०, हरणी ३.१६०, खंडाळा ०.७३३, जकापूर ६.१९६, तुरोरी ३.४३८ आणि बेन्नीतुरा प्रकल्पामध्ये १.७४९ दलघमी उपयुक्त साठा उरला आहे. यापैकी अनेक प्रकल्पांतून पाणीउपसा सुरू असल्याने जलस्तर झपाट्याने कमी होऊ लागला आहे. 

तुलनात्मक चित्र...प्रकल्प    प्रकार    यंदा    गतवर्षीमोठे        ००.००    ८९.९५ टक्केमध्यम        १२.४५    ८२.०८ टक्केलघु        १२.५०    ५३.०३ टक्केएकूण        ११.१२    ६५.४६ टक्के(कंसातील टक्केवारी उपयुक्त साठा दर्शवते)

टॅग्स :WaterपाणीOsmanabadउस्मानाबादDamधरण