शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

दहा वर्षांत ५०७ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यात मागील दहा वर्षात महावितरणच्या देयकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या ५०७ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.

संजय कुलकर्णी ,जालनाजिल्ह्यात मागील दहा वर्षात महावितरणच्या देयकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या ५०७ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या देयकांची एकूण थकबाकी १ कोटी ६५ लाख रुपये एवढी आहे. सध्या ग्रामीण भागात दुष्काळाची चाहूल लागली आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून शासन करोडो रुपये खर्च करून योजना तयार करत आहेत. मात्र या योजना कितपत टिकतात, याकडे नंतर दुर्लक्ष होते. योजनांची देखभाल व दुरूस्ती अनेक ठिकाणी व्यवस्थित होत नाही. ग्रामपंचायतीकडून महावितरणच्या देयकांच्या थकबाकीचा भरणा न झाल्यास ऐनवेळी वीजपुरवठा खंडित करावा लागतो. सध्या शासनाच्या धोरणानुसार पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला जात नाही. परंतु काही नवीन योजना आणण्यासाठी जुन्या योजनांच्या थकबाकीचा मुद्दा अडचणीचा ठरतो. त्यामुळे गावाला नवीन पाणीपुरवठा योजना आणण्यात अडचणी येत आहेत. वसुलीसाठी प्रयत्नयासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बी.टी. पानढवळे म्हणाले की, पाणीपुरवठा योजनांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून त्यापैकी ५०७ योजना बंद झालेल्या आहेत. त्यांची देयके देण्यास आता ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे या वसुलीसंदर्भातील मुद्दा शासन पातळीवर चर्चित आहे. (समाप्त)