शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:51 IST

विभागातील ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीत दिले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सुमारे ५० टक्के म्हणजेच तीन लाख ५० हजार हेक्टरवरील ऊस शेतात उभा असल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी वाढू लागल्या आहेत. विभागातील ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीत दिले. सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, औरंगाबाद, नांदेड, सोलापूरचे साखर सहसंचालक, खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रतिनिधी, आरडीसी ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.

किती उसाची नोंद झाली आहे, किती नोंदणीविना आहे, याची तालुकानिहाय घेतलेली नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सादर केली. नोंदणी केलेला पूर्ण ऊस कारखानदारांनी घेतलाच पाहिजे. ३१ मेपर्यंत गाळप झाले पाहिजे, अशा सूचना कारखानदारांना आयुक्तांनी केल्या. तसेच गाळप वाढविण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कारखाने चालविण्याच्या सूचना केल्या आहेत. ऊसतोडीसाठी माणसे नसतील तर शेजारच्या जिल्ह्यातून ऊसतोड यंत्र मागवून घेण्याचे कारखानदारांना सांगितले. ऊस संपेपर्यंत कारखाने बंद करायचे नाहीत, असे आदेश त्यांनी दिले.

पुढच्या ६० दिवसात कारखाने सुरू राहिले तर किती गाळप होईल याचा अंदाज बांधण्यात आला असून, ३१ मेनंतरदेखील कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ऊसतोडणी यंत्र पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात आणण्यासाठी साखर आयुक्तांशी चर्चा करण्याचे ठरले आहे. लातूर, उस्मानाबादमूधन सोलापूरला ऊस जात आहे. सोलापूरकडून गाळप बंद झाले तर अडचणी निर्माण होतील, त्यासाठी तिकडील कारखाने मेअखेरपर्यंत चालणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले.

मराठवाड्यात ५८ कारखानेऔरंगाबाद-७, जालना-५, बीड-७, नांदेड-६, परभणी-६, हिंगोली-५, लातूर-१०, उस्मानाबाद-१२ अशा ५८ खासगी व सहकारी कारखान्यांचा समावेश आहे.

उसाची लागवड झालेले क्षेत्रसहा लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. यातून पाच कोटी १७ लाख मेट्रिक टन गाळप होणे शक्य आहे. यातील ५० टक्के गाळप होत आली आहे. हंगामी आणि कायमस्वरूपी मिळून ३० ते ३५ हजारांच्या आसपास रोजगार मराठवाड्यात साखर उद्योगांत आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करू नकाकाही कारखान्यांच्या क्षेत्रात गाळप आणि लागवडीचे गणित बिघडले आहे. त्यामुळे किती गाळप करणे शक्य आहे, त्यानुसारच कारखानदारांनी आगामी काळात शेतकऱ्यांना शब्द द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांची विनाकारण फसवणूक करू नये, असे आदेश बैठकीत देण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय