शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:51 IST

विभागातील ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीत दिले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सुमारे ५० टक्के म्हणजेच तीन लाख ५० हजार हेक्टरवरील ऊस शेतात उभा असल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी वाढू लागल्या आहेत. विभागातील ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीत दिले. सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, औरंगाबाद, नांदेड, सोलापूरचे साखर सहसंचालक, खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रतिनिधी, आरडीसी ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.

किती उसाची नोंद झाली आहे, किती नोंदणीविना आहे, याची तालुकानिहाय घेतलेली नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सादर केली. नोंदणी केलेला पूर्ण ऊस कारखानदारांनी घेतलाच पाहिजे. ३१ मेपर्यंत गाळप झाले पाहिजे, अशा सूचना कारखानदारांना आयुक्तांनी केल्या. तसेच गाळप वाढविण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कारखाने चालविण्याच्या सूचना केल्या आहेत. ऊसतोडीसाठी माणसे नसतील तर शेजारच्या जिल्ह्यातून ऊसतोड यंत्र मागवून घेण्याचे कारखानदारांना सांगितले. ऊस संपेपर्यंत कारखाने बंद करायचे नाहीत, असे आदेश त्यांनी दिले.

पुढच्या ६० दिवसात कारखाने सुरू राहिले तर किती गाळप होईल याचा अंदाज बांधण्यात आला असून, ३१ मेनंतरदेखील कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ऊसतोडणी यंत्र पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात आणण्यासाठी साखर आयुक्तांशी चर्चा करण्याचे ठरले आहे. लातूर, उस्मानाबादमूधन सोलापूरला ऊस जात आहे. सोलापूरकडून गाळप बंद झाले तर अडचणी निर्माण होतील, त्यासाठी तिकडील कारखाने मेअखेरपर्यंत चालणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले.

मराठवाड्यात ५८ कारखानेऔरंगाबाद-७, जालना-५, बीड-७, नांदेड-६, परभणी-६, हिंगोली-५, लातूर-१०, उस्मानाबाद-१२ अशा ५८ खासगी व सहकारी कारखान्यांचा समावेश आहे.

उसाची लागवड झालेले क्षेत्रसहा लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. यातून पाच कोटी १७ लाख मेट्रिक टन गाळप होणे शक्य आहे. यातील ५० टक्के गाळप होत आली आहे. हंगामी आणि कायमस्वरूपी मिळून ३० ते ३५ हजारांच्या आसपास रोजगार मराठवाड्यात साखर उद्योगांत आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करू नकाकाही कारखान्यांच्या क्षेत्रात गाळप आणि लागवडीचे गणित बिघडले आहे. त्यामुळे किती गाळप करणे शक्य आहे, त्यानुसारच कारखानदारांनी आगामी काळात शेतकऱ्यांना शब्द द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांची विनाकारण फसवणूक करू नये, असे आदेश बैठकीत देण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय