शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी ठरविल्यास होईल ५० टक्के कॅन्सर हद्दपार

By admin | Updated: February 4, 2015 00:41 IST

आशपाक पठाण , लातूर तंबाखू, सिगारेट, गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात वाढल्याने तरूणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे़

आशपाक पठाण , लातूरतंबाखू, सिगारेट, गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात वाढल्याने तरूणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे़ शाळा-महाविद्यालय परिसरात १०० मीटर अंतरावर बंदी असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही़ केवळ महसूल मिळतोय म्हणून शासनाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ मराठवाड्यात बहुतांश रूग्णांना तोंडाच्या कॅन्सर जडला असून योग्य वेळी उपचार घेतल्यास दिलासा मिळू शकतो़ तरूणांनी ठरविले तर ५० टक्के कॅन्सर हद्दपार होऊ शकतो, असे मत लातूर येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ़ ब्रिजमोहन झंवर यांनी व्यक्त केले़जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’शी बोलताना डॉ़ झंवर यांनी कर्करोगाचा उलगडा केला़ तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन हे आरोग्यास घातक असतानाही व्यसन ही फॅशन ही बनली आहे़ तरूणांमध्ये याची क्रेझ वाढतच चालली आहे़ त्यामुळे बहुतांश तरूणांना तोंडाच्या कॅन्सरचा उलगडा झाला आहे़ अनेकांना लक्षणे माहिती असल्याने स्वत:ला सर्व गोष्टी जाणवत असल्या तरी मनात भिती बाळगून वैद्यकीय उपचारासाठी काहीजण घाबरतात़ मात्र, योग्य वेळी उपचार झाल्यास कर्करोगापासून बचाव होतो़ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळल्यास ३० ते ३५ टक्के रूग्णसंख्या सहजपणे घटू शकते असा दावा करीत डॉ़ झंवर म्हणाले, यावर वेळीच आळा घातला नाही तर आगामी २० वर्षांत रूग्णसंख्या दुप्पट होईल़ तरूणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केल्यास ५० टक्के कॅन्सरच्या रूग्णांची घटू शकते़ शाळेच्या १०० मीटर परिसरापर्यंत गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असतानाही लातुरात पानटपऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत़ येथून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे़ महिलांमध्ये ७० व्या वर्षांपर्यंत ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे़ रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कसल्याही प्रकारची औषधी घेऊ नयेत़ बहुतांश रूग्ण हे डॉक्टरांपर्यत पोहचत नसल्याने आजार बळावतो़ कॅन्सरचा आजार बळावू नये यासाठी आजाराची माहिती करून घेणे गरजेचे आहे, असेही डॉ़ ब्रिजमोहन झंवर यांनी सांगितले़ ४४कॅन्सरग्रस्त मुलीसाठी पित्याची दोन वर्षांपासून धडपड (वृत्त हॅलो २ वर)\लातूर शहरात दोन कॅन्सरतज्ज्ञ आहेत़ त्यांच्याकडे दररोज २५ ते ३० नवे रूग्ण उपचारासाठी येतात़ त्यामध्ये ५० वर्षांहून कमी वय असलेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे़ तोंडात लाल, पांढरे चट्टे, आवाज घोगरा, थुंकी, बेडका व शौचातून रक्तस्त्राव, शारिरिक संबंधानंतर होणारा रक्तस्त्राव आदी कर्करोगाची लक्षणे असल्याचे डॉ़ झंवर यांनी सांगितले़ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळल्यास कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो़ सर्वाधिक रूग्ण हे तोंडाचे आहेत़ कॅन्सरतज्ज्ञांची सामाजिक बांधिलकी़़़४सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व्यावसायिक कक्षेच्या बाहेर जाऊन राज्यभरातील ५० कॅन्सरतज्ज्ञांनी महाराष्ट्र वॉरियर ग्रुपची स्थापना केली आहे़ डॉ़ पंकज चतुर्वेदी व अन्य ज्येष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात हा ग्रुप काम करतो़ १५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये जागृती केली आहे़ बहुतांश रूग्ण हे डॉक्टरांपर्यंत येत नाहीत, त्यासाठी शासकीय रूग्णालयात जिल्हास्तरावर आठवड्यातून २ तास मोफत सेवा देण्याचा संकल्प आहे़ त्यानुसार मी आणि डॉ़ अजय पुनपाळे हे लातूर जिल्ह्यात काम करणार असल्याचे डॉ़ झंवर म्हणाले़