शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

पाच ठाणे अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: May 26, 2014 01:14 IST

औरंगाबाद : शहरातील १३ पोलीस ठाण्यांमधील अंमलदारांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा अनुभव दस्तूरखुद पोलीस आयुक्तांना आला आहे

औरंगाबाद : शहरातील १३ पोलीस ठाण्यांमधील अंमलदारांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा अनुभव दस्तूरखुद पोलीस आयुक्तांना आला आहे. आयुक्तांनी पाठविलेल्या डमी तक्रारदारांना वाईट वागणूक दिलेल्या ५ ठाणे अंमलदारांना आयुक्त राजेंद्र सिंह यांनी कारणेदर्शक नोटीस बजावून दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, अंमलदारांचे वर्तन सुधारण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी कार्यशाळा घेतली होती. ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्य जनतेची दखल त्यांनी तत्परतने घ्यावी, यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते; पण अंमलदारांच्या वर्तनात किंचितही सुधारणा झालेली नाही. सामान्य जनतेचे गाºहाणे ऐकूण न घेता त्यांना ताटकळत ठेवणे, तक्रारदारांचीच उलट तपासणी करणे, त्यांना दिवसभर बसवून ठेवल्यानंतर परत दुसर्‍या दिवशी बोलावणे, या गोष्टींमुळेच समाजात पोलिसांप्रति दुरावा निर्माण होत आहे. समाज व पोलिसांत सुसंवाद असावा, मैत्रीचे संबंध असावेत, यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात; पण ठाणे अंमलदारांची बोली व कृतीमुळे सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांप्रति सतत तिरस्कारच निर्माण झालेला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना जास्त वेळ ताटकळत बसवून न ठेवता त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यांच्या तक्रारीनुसार व वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळ न दवडता तक्रार दाखल करून घ्यावी, असे पोलीस आयुक्तांचे आदेश असताना शहरातील अनेक ठाण्यांमध्ये अंमलदारांकडून तक्रारदार नागरिकांचाच छळ केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. २० मे रोजी आयुक्तांनी शहरातील ८ पोलीस ठाण्यांत डमी तक्रारदार पाठविले. तेथे क्रांतीचौक, जवाहरनगर, उस्मानपुरा, मुकुंदवाडी व एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या अंमलदारांचा डमी तक्रारदारांना अतिशय वाईट अनुभव आला. काही अंमलदारांनी तक्रारदारांना अरेरावी करीत त्यांची खरडपट्टी काढली, तर काहींनी तक्रारदारांना दुसर्‍या दिवशी येण्याचे फर्मान सोडले. सामान्य नागरिक व पोलिसांमध्ये सौहार्दतेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस दल प्रयत्नात असताना अंमलदार मात्र नागरिकांशी व्यवस्थित बोलत नाहीत.