शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

मराठवाड्यातील ४७ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका, बागायती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान

By विकास राऊत | Updated: November 29, 2023 12:36 IST

पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाचा ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. ५९८ गावे या पावसाने बाधित झाली असून सर्वाधिक नुकसान बागायती क्षेत्राचे झाल्याचे विभागीय प्रशासनाने प्राथमिक अहवालाच्या आधारे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड या तीन जिल्ह्यांतील पिकांचे जास्तीचे नुकसान झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांनाही कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर सर्व मिळून १७५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २४ घरांची अंशत: पडझड झाली. इतर १४ व ८ गोठ्यांचे पावसाने नुकसान केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिरायती २१ हजार ३४९, बागायती २४ हजार ७८९ तर ६४ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ४६ हजार २०२ हेक्टरवरील पिकांची पावसाने माती केली.

परभणी जिल्ह्यात जिरायती ५३३, बागायती ६६, फळबागा ९३ हेक्टर तर बीड जिल्ह्यात जिरायती २१५ हेक्टरचे पीक वाया गेले. पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

ती मदत ऑनलाईनच्या फेऱ्यात...मराठवाड्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले. ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांचा मदतनिधी मिळावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली, अद्याप ती मदत ऑनलाईनच्या फेऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने मिळालेली नाही. विभागात ८ ते २० मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांचे ६० हजार ४०२ हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, तसेच फळबागांचे नुकसान झाले. मराठवाड्यात जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी २० कोटी ९२ लाख, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ५१ कोटी ५९ लाख, फळपिकांच्या नुकसानीसाठी १२ कोटी २३ लाख, असे सुमारे ८४ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांची मदत प्रशासनाने मागितली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३,५३५ हेक्टरच्या नुकसानीपोटी २२ कोटी, जालन्यात १,९६९.४९ हेक्टरसाठी साडेतीन कोटी, परभणी ३,९६०.८१ हेक्टरसाठी साडेचार कोटी, हिंगोलीत ३,८३८.७२ हेक्टरसाठी ६ कोटी , नांदेड २१,५७९.५० हेक्टरसाठी ३१ कोटी, बीड ३,८०२.०२ हेक्टरसाठी ६ कोटी, लातूर जिल्ह्यात १०,३६७.८३ हेक्टरसाठी ११ कोटी, धाराशिव १,३४९.०० हेक्टरसाठी दीड कोटी मिळून विभागातील एकूण ६०,८१९.१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

एका दिवसात नुकसान किती ?जिरायत: २२ हजार ९७ हेक्टरबागायती: २४ हजार ८५५ हेक्टरफळबागा: १५७ हेक्टर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस