शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मराठवाड्यातील ४७ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका, बागायती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान

By विकास राऊत | Updated: November 29, 2023 12:36 IST

पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाचा ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. ५९८ गावे या पावसाने बाधित झाली असून सर्वाधिक नुकसान बागायती क्षेत्राचे झाल्याचे विभागीय प्रशासनाने प्राथमिक अहवालाच्या आधारे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड या तीन जिल्ह्यांतील पिकांचे जास्तीचे नुकसान झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांनाही कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर सर्व मिळून १७५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २४ घरांची अंशत: पडझड झाली. इतर १४ व ८ गोठ्यांचे पावसाने नुकसान केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिरायती २१ हजार ३४९, बागायती २४ हजार ७८९ तर ६४ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ४६ हजार २०२ हेक्टरवरील पिकांची पावसाने माती केली.

परभणी जिल्ह्यात जिरायती ५३३, बागायती ६६, फळबागा ९३ हेक्टर तर बीड जिल्ह्यात जिरायती २१५ हेक्टरचे पीक वाया गेले. पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

ती मदत ऑनलाईनच्या फेऱ्यात...मराठवाड्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले. ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांचा मदतनिधी मिळावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली, अद्याप ती मदत ऑनलाईनच्या फेऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने मिळालेली नाही. विभागात ८ ते २० मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांचे ६० हजार ४०२ हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, तसेच फळबागांचे नुकसान झाले. मराठवाड्यात जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी २० कोटी ९२ लाख, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ५१ कोटी ५९ लाख, फळपिकांच्या नुकसानीसाठी १२ कोटी २३ लाख, असे सुमारे ८४ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांची मदत प्रशासनाने मागितली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३,५३५ हेक्टरच्या नुकसानीपोटी २२ कोटी, जालन्यात १,९६९.४९ हेक्टरसाठी साडेतीन कोटी, परभणी ३,९६०.८१ हेक्टरसाठी साडेचार कोटी, हिंगोलीत ३,८३८.७२ हेक्टरसाठी ६ कोटी , नांदेड २१,५७९.५० हेक्टरसाठी ३१ कोटी, बीड ३,८०२.०२ हेक्टरसाठी ६ कोटी, लातूर जिल्ह्यात १०,३६७.८३ हेक्टरसाठी ११ कोटी, धाराशिव १,३४९.०० हेक्टरसाठी दीड कोटी मिळून विभागातील एकूण ६०,८१९.१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

एका दिवसात नुकसान किती ?जिरायत: २२ हजार ९७ हेक्टरबागायती: २४ हजार ८५५ हेक्टरफळबागा: १५७ हेक्टर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस