४५० आॅटोरिक्षा परवाने रखडले
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-13T23:59:06+5:302014-06-14T01:20:23+5:30
जालना : परिवहन विभागाने शैक्षणिक पात्रतेची अट घातल्याने जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकाचे चारशे परवाने मंजुरी अभावी पडून आहेत.
४५० आॅटोरिक्षा परवाने रखडले
जालना : परिवहन विभागाने शैक्षणिक पात्रतेची अट घातल्याने जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकाचे चारशे परवाने मंजुरी अभावी पडून आहेत. परिवहन विभागाच्या उपपा्रदेशिक कार्यालयाने तातडीने हे परवाने द्यावेत अशी मागणी संयुक्त लोकतांत्रिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अब्दूल रफीक अब्दूल लतीफ यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
१९९७ पासून जिल्ह्यात नवीन आॅटोरिक्षांना परवाने परवाने देणे स्थगीत करण्यात आले. सोळा वर्षानंतर २०१३ - १४ जिल्हा व शहरासाठी १ हजार ३१४ आॅटोरिक्षा देण्याचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात आला. त्यास परिवहन विभागाने जाहीर प्रसिध्दी दिली. ज्यामध्ये वाहन चालविण्याचा बॅच असेल त्यांच्याकडून परवान्यासाठी अर्ज मागविले. त्यानंतर आॅटोरिक्षा परवान्यासाठी परिवहन विभागाच्या जालना उपप्रादेशिक कार्यालयाकडे ८५० अर्ज प्राप्त झाले. त्यात अनेक अर्ज आठवी पास परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्यांचे होते. परिवहन विभागाने केलेल्या आवाहनानुसारच सादर केले होते. छाननीनंतर ८५० पैकी ४४९ अर्ज मंजूर करण्यात येऊन ४०१ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले. प्रलंबित अर्जाची पुन्हा छाननी करून पनवान्याची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु ती प्रत्यक्षात कधी लागणार याची कोणीही माहिती देत नाही.
पहिल्या यादीस तीन महिने उलटले तरी दुसरी यादी तयार करण्याबाबत कोणतीही हालचाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दिसत नाही. अनेक आॅटोरिक्षा चालक भाडयाची रिक्षा चालवतात. अनेकाकडे स्वत:च्या मालकीची रिक्षा व बॅच आहेत परंतु परवाना नाही. अनेक चालक आठवीपर्यंत शिक्षण घेऊ शकले नाहीत.
त्यामुळे आठवीपर्यंत शिक्षणाच्या अटीमुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यांचे उपजीविकेचे साधन संपुष्टात येणार आहे.
६० ते ७० टक्के आॅटोरिक्षा चालक आठवीपेक्षा कमी शिकले आहेत. त्यामुळे शिक्षणाची अट शिथिल करून प्रलंबित असलेल्या ४०१ अर्जाची पुनछांननी करून परवाने देण्याची मागणी अब्दुल रफीक यांनी केली आहे.
या निवेदनावर रंजीत देशपांडे, नंदकिशोर रामरखय्या, प्रल्हाद घुमारे, शेख कलीम, शेख इब्राहीम, शेख अकील, अनवर खाँ, शेख गप्फार, शेख अजमत, शेख अकबर, शेख जुनेद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(प्रतिनिधी)
अर्ज प्रलंबितच...
८५० पैकी ४४९ अर्ज मंजूर करण्यात येऊन ४०१ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले. प्रलंबित अर्जाची पुन्हा छाननी करून पनवान्याची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु ती प्रत्यक्षात कधी लागणार याची कोणीही माहिती देत नाही.