मद्य कंपन्यांचे पाणी ४५ % कपातीचा प्रस्ताव
By Admin | Updated: April 24, 2016 00:14 IST2016-04-24T00:04:18+5:302016-04-24T00:14:58+5:30
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाण्याची उपलब्धता पाहून मद्य कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात आतापर्यंत ३० टक्के कपात करण्यात आली आहे.

मद्य कंपन्यांचे पाणी ४५ % कपातीचा प्रस्ताव
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाण्याची उपलब्धता पाहून मद्य कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात आतापर्यंत ३० टक्के कपात करण्यात आली आहे. आता आणखी ५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तसेच पुढेही पाच-पाच टक्के याप्रमाणे एकूण ४५ टक्क्यांपर्यंत पाणी कपातीचा प्रस्ताव असून तोच उच्च न्यायालयात मांडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.
महाजन यांनी शनिवारी पाणी कपातीच्या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उच्च न्यायालयाने मद्य कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात पन्नास टक्क्यांपर्यंत पाणी कपात करण्यात सांगितली आहे. त्या अनुषंगाने उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला. जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात सध्या २१ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यातील आणखी ९ टीएमसी पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाऊस लांबला तरी शहराला आणि उद्योगांना आतापासून पुढील शंभर दिवस सहज पाणी पुरूशकणार आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून आतापर्यंत दोन टप्प्यात ३० टक्क्यांपर्यंत पाणी कपात करण्यात आली आहे.
मद्य कंपन्यांचे अजून पाच टक्के पाणी कपात केले जाणार आहे. त्यानंतर पुढे दोन टप्प्यात पाच पाच टक्के याप्रमाणे एकूण ४५ टक्क्यांपर्यंत पाणी कपातीचे नियोजन केले आहे. हा प्रस्ताव उच्च न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. तो प्रस्ताव न्यायालयाकडून मान्य होईल, असे वाटते, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.