शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

छत्रपती संभाजीनगरात ४३ वाहतूक सिग्नल; ६ कोटींचा खर्च, निम्मे धूळखात, जबाबदार कोण?

By मुजीब देवणीकर | Updated: August 22, 2025 19:38 IST

सर्व सिग्नल सुरू राहिल्यास कुठेही वाहतूककोंडी होणार नाही

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडी हमखास असतेच. वर्षानुवर्षे शहरवासीय या वाहतूककोंडीचा सामना करीत आहेत. वाहनधारकांची यातून कायमची सुटका व्हावी, असे कोणालाही वाटत नाही. वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून शहरात तब्बल ४३ चौकांमध्ये वाहतूक सिग्नल महापालिकेने बसविले. त्यासाठी जवळपास ६ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, वाहतूक पोलिस निम्म्याहून अधिक सिग्नलच बंद ठेवतात. कारण, काय तर पोलिस कर्मचाऱ्यांचा अभाव. दररोज सर्व सिग्नल सुरू ठेवले तर शहरात एकाही चौकात वाहतूककोंंडी होणारच नाही, असा दावा महापालिकेचा आहे.

सकाळी ९ ते ११ पर्यंत शहरातील मुख्य रस्ते वाहनांनी गजबजलेले असतात. प्रत्येकाला कार्यालयात, कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या कामासाठी जायचे असते. सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहनसंख्या दुपटीने वाढलेली असते. अशा वेळी चौकाचौकांत वाहतूककोंडी असते. या वाहतूककोंडीतून शहरवासीय दररोज मार्ग काढत घर गाठतात. जालना रोडवर, तर मनपाने सिंक्रोनाइज (एकाच वेळी काम करणारी यंत्रणा) पद्धतीने सिग्नल बसविले. नगरनाका येथून निघालेले एखादे वाहन कोणत्याही सिग्नलवर न थांबता मुकुंदवाडीपर्यंत जाऊ शकते. मात्र, जालना रोडवरील बहुतांश सिग्नल बंद असतात. गर्दीच्या वेळी वाहतूक सिग्नल सुरू ठेवले, तर चारही बाजूची वाहतूक थोड्या-थोड्या वेळाने निघून जाऊ शकते. मात्र, वाहतूक पोलिस कर्मचारी नाहीत, म्हणून बहुतांश सिग्नल बंद ठेवतात. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या सिग्नलला जंगली झाडे, वेलींनी वेढा घातला आहे.

एक स्मार्ट सिग्नल २० लाखांचेमहापालिकेने अलीकडेच शहरात १५ ठिकाणी स्मार्ट सिग्नलची उभारणी केली. एका सिग्नलचा खर्च २० लाख रुपये होता. ३ कोटी ३० लाख रुपये यावर खर्च करण्यात आले. जुन्या सिग्नलची संख्या २८ आहे. प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे २ कोटी ८० लाख रुपये खर्च झाले.

नवीन स्मार्ट सिग्नलचे ठिकाणहॉटेल कार्तिकी, समर्थनगर, सिल्लेखाना, रेल्वे स्टेशन, महानुभव आश्रम चौक, शहानुरमियाँ दर्गा चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, उद्धवराव पाटील चौक, धूत हॉस्पिटल चौक, मुकुंदवाडी, केम्ब्रिज चौक, शरद हॉटेल चौक, टीव्ही सेंटर, वोखार्ड चौक.

जुने सिग्नल कोणत्या चौकातज्युब्लिपार्क, मिलकॉर्नर, महावीर चौक, नगरनाका, कोकणवाडी, जिल्हा न्यायालय, क्रांतीचौक, बीएसएनएल चौक, मोंढानाका, अमरप्रित, आकाशवाणी, एपीआय कॉर्नर, खंडपीठासमोर, वसंतराव नाईक चौक, एन-१, आंबेडकर चौक, एसबीओए चौक, जवाहरनगर चौक, सुतगिरणी चौक, रोपळेकर चौक, सिटी क्लब, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगपुरा, पंचवटी चौक, बजरंग चौक, चिस्तिया चौक, मिलिंद चौक, चंपा चौक.

पोलिसांनी वापर करावावाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार आजपर्यंत प्रत्येक चौकात सिग्नल उभारले. याचा वापर करण्याचे दायित्व वाहतूक पोलिसांचे आहे. बंद ठेवून काहीच उपयोग नाही. शंभर टक्के वाहतूक सिग्नल सुरू ठेवल्यास शहरात कुठेही वाहतूककोंडी होणार नाही.- मोहिनी गायकवाड, कार्यकारी अभियंता मनपा.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTrafficवाहतूक कोंडीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका