४३ टँकरने केला जातोय पाणीपुरवठा
By Admin | Updated: February 4, 2015 00:41 IST2015-02-04T00:24:07+5:302015-02-04T00:41:51+5:30
बीड: जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. मागील आठ दिवसांत पंधराच्या जवळपास टँकर वाढले आहेत. ४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

४३ टँकरने केला जातोय पाणीपुरवठा
बीड: जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. मागील आठ दिवसांत पंधराच्या जवळपास टँकर वाढले आहेत. ४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये ३२ गावे तर ३६ वाड्यांचा समावेश आहे.
मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. परिणामी गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. आज स्थितीत ४३ टँकरद्वारे ६८ गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याची तीव्रता सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातील हातपंप तळ गाठू लागले असल्याने ग्रामस्थ संबंधीत तहसिलदारांकडे टँकरची मागणी करू लागले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हळूहळू टंचाई जाणवू लागली आहे. आष्टी तालुक्यात मात्र सर्वाधिक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. आज स्थितीत ३६ गावे टंचाईग्रस्त आहेत. संबंधीत तहसीलदारांकडे आठ ते दहाच्या जवळपास टँकर मागणीचे प्रस्ताव असल्याचे समजते.(प्रतिनिधी)