४ लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात !

By Admin | Updated: July 21, 2016 01:12 IST2016-07-21T01:02:55+5:302016-07-21T01:12:37+5:30

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़

4 lakh hectares of soyabean danger! | ४ लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात !

४ लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात !


लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़ परंतु, यातील ३ लाख ९३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु, या पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत जून-जुलैमध्ये २१४़१ मि़मी़ पाऊस झाला़ झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या केल्या़ आणखी पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी कोळपणीही सुरू केली़ परंतु, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवरील पिके पावसाअभावी कोमेजू लागली आहेत़ पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीन पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती होती. परंतु, यावर्षी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. परंतु, पुन्हा उघडीप दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 4 lakh hectares of soyabean danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.