शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराच्या ३५० रिक्षा जीपीएसविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 12:57 IST

रिक्षांचे भाडे कोट्यवधींमध्ये जात असतानाही प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.

ठळक मुद्देस्वच्छता निरीक्षकांच्या माहितीवर कंत्राटदाराला प्रति रिक्षा दरमहा २९ हजार रुपये भाडे देण्यात येत आहे.

औरंगाबाद : शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेने आपल्या मालकीच्या १५० रिक्षांना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. कंत्राटदारामार्फत घेतलेल्या तब्बल ३५० रिक्षांना ही यंत्रणाच बसविली नसल्याचे उघडकीस आले. दररोज या रिक्षा येतात का? याची पाहणीही वरिष्ठ अधिकारी करीत नाहीत. स्वच्छता निरीक्षकांच्या माहितीवर कंत्राटदाराला प्रति रिक्षा दरमहा २९ हजार रुपये भाडे देण्यात येत आहे. रिक्षांचे भाडे कोट्यवधींमध्ये जात असतानाही प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.

मागील दोन वर्षांमध्ये महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने आऊटसोर्सिंगच्या नावावर कोट्यवधींचा खर्च वाढवून ठेवला आहे. कचरा उचलण्यासाठी पूर्वी प्रत्येक वॉर्डाला एक रिक्षा दिली होती. नगरसेवकांची ओरड सुरू होताच प्रशासनाने प्रत्येक वॉर्डाला दोन रिक्षा दिल्या. यावरही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. आता तीन रिक्षा दिल्या आहेत. ११५ वॉर्डांना प्रत्येकी ३ रिक्षा आहेत. महापालिकेनेही १५० रिक्षा खरेदी केल्या. या रिक्षा कोणत्या वॉर्डात जातात, कुठे थांबतात हे पाहण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. कंत्राटदाराकडून घेतलेल्या ३५० रिक्षांना मागील दोन वर्षांमध्ये मनपाने जीपीएस यंत्रणाच बसविली नाही. त्यामुळे ३५० रिक्षा दररोज कचरा उचलण्यासाठी येतात, हे ठामपणे एकही अधिकारी सांगू शकत नाही. स्वच्छता निरीक्षकांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर रिक्षांचे बिल काढण्यात येते. शहरात आऊटसोर्सिंगवर अनेक स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे निरीक्षक काम करीत आहेत. 

खाजगी टँकरलाही जीपीएसमहापालिकेने खाजगी कंत्राटदाराच्या सर्व ८० टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याची सक्ती केली. कंत्राटदाराने दोन महिन्यांपूर्वी ही यंत्रणा बसवून घेतली. जीपीएस यंत्रणेसोबत चालकाने छेडछाड केल्यास अधिकाऱ्यांच्या लक्षात येते. मनपाच्या रिक्षांवरील जीपीएस यंत्रणा खराब झाल्यास चालकांचे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपनीला दंड ठोठावण्यात येतो.

प्रशासनाची तत्परताकचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या रिक्षांची संख्या वाढावी यासाठी यांत्रिकी विभागाचे अधिकारीच उत्साही असतात. या कंत्राटदाराचे बिल वेळेवर तयार होते. लेखा विभागात वेळेपूर्वीच जमा करण्यात येते. दरमहिन्याला बिलही वेळेवर अदा होते.

टेंडरमध्ये अट नाहीरिक्षा भाडेतत्त्वावर घेताना टेंडरमध्ये जीपीएस यंत्रणेची अटच टाकलेली नाही. वॉर्डातील स्वच्छता निरीक्षक,जवान अहवाल देतात, त्यावरून बिल काढतो.- देवीदास पंडित, प्रभारी उपअभियंता

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMONEYपैसा