शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

औरंगाबादेत कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराच्या ३५० रिक्षा जीपीएसविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 12:57 IST

रिक्षांचे भाडे कोट्यवधींमध्ये जात असतानाही प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.

ठळक मुद्देस्वच्छता निरीक्षकांच्या माहितीवर कंत्राटदाराला प्रति रिक्षा दरमहा २९ हजार रुपये भाडे देण्यात येत आहे.

औरंगाबाद : शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेने आपल्या मालकीच्या १५० रिक्षांना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. कंत्राटदारामार्फत घेतलेल्या तब्बल ३५० रिक्षांना ही यंत्रणाच बसविली नसल्याचे उघडकीस आले. दररोज या रिक्षा येतात का? याची पाहणीही वरिष्ठ अधिकारी करीत नाहीत. स्वच्छता निरीक्षकांच्या माहितीवर कंत्राटदाराला प्रति रिक्षा दरमहा २९ हजार रुपये भाडे देण्यात येत आहे. रिक्षांचे भाडे कोट्यवधींमध्ये जात असतानाही प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.

मागील दोन वर्षांमध्ये महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने आऊटसोर्सिंगच्या नावावर कोट्यवधींचा खर्च वाढवून ठेवला आहे. कचरा उचलण्यासाठी पूर्वी प्रत्येक वॉर्डाला एक रिक्षा दिली होती. नगरसेवकांची ओरड सुरू होताच प्रशासनाने प्रत्येक वॉर्डाला दोन रिक्षा दिल्या. यावरही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. आता तीन रिक्षा दिल्या आहेत. ११५ वॉर्डांना प्रत्येकी ३ रिक्षा आहेत. महापालिकेनेही १५० रिक्षा खरेदी केल्या. या रिक्षा कोणत्या वॉर्डात जातात, कुठे थांबतात हे पाहण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. कंत्राटदाराकडून घेतलेल्या ३५० रिक्षांना मागील दोन वर्षांमध्ये मनपाने जीपीएस यंत्रणाच बसविली नाही. त्यामुळे ३५० रिक्षा दररोज कचरा उचलण्यासाठी येतात, हे ठामपणे एकही अधिकारी सांगू शकत नाही. स्वच्छता निरीक्षकांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर रिक्षांचे बिल काढण्यात येते. शहरात आऊटसोर्सिंगवर अनेक स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे निरीक्षक काम करीत आहेत. 

खाजगी टँकरलाही जीपीएसमहापालिकेने खाजगी कंत्राटदाराच्या सर्व ८० टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याची सक्ती केली. कंत्राटदाराने दोन महिन्यांपूर्वी ही यंत्रणा बसवून घेतली. जीपीएस यंत्रणेसोबत चालकाने छेडछाड केल्यास अधिकाऱ्यांच्या लक्षात येते. मनपाच्या रिक्षांवरील जीपीएस यंत्रणा खराब झाल्यास चालकांचे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपनीला दंड ठोठावण्यात येतो.

प्रशासनाची तत्परताकचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या रिक्षांची संख्या वाढावी यासाठी यांत्रिकी विभागाचे अधिकारीच उत्साही असतात. या कंत्राटदाराचे बिल वेळेवर तयार होते. लेखा विभागात वेळेपूर्वीच जमा करण्यात येते. दरमहिन्याला बिलही वेळेवर अदा होते.

टेंडरमध्ये अट नाहीरिक्षा भाडेतत्त्वावर घेताना टेंडरमध्ये जीपीएस यंत्रणेची अटच टाकलेली नाही. वॉर्डातील स्वच्छता निरीक्षक,जवान अहवाल देतात, त्यावरून बिल काढतो.- देवीदास पंडित, प्रभारी उपअभियंता

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMONEYपैसा