शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

३५ फरार गुन्हेगारांची संपत्ती होणार जप्त; औरंगाबाद पोलिसांनी न्यायालयाकडून मिळविले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 12:37 IST

शहर पोलिसांना विविध गुन्ह्यांत तब्बल दीड हजार गुन्हेगार सापडत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी फरार गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्दे पहिल्या टप्प्यात ३५ फरारींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाकडून मिळविल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.शहर आयुक्तालयांतर्गत विविध गुन्ह्यांत १,५२४ गुन्हेगार १५ ते २० वर्षांपासून पोलिसांना सापडत नाहीत

औरंगाबाद : शहर पोलिसांना विविध गुन्ह्यांत तब्बल दीड हजार गुन्हेगार सापडत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी फरार गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पहिल्या टप्प्यात ३५ फरारींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाकडून मिळविल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

याविषयी अधिक माहिती अशी की, शहर आयुक्तालयांतर्गत विविध गुन्ह्यांत १,५२४ गुन्हेगार १५ ते २० वर्षांपासून पोलिसांना सापडत नसल्याचे वृत्त दि.२ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्तामध्ये कोणत्या पोलीस ठाण्यांतर्गत किती आरोपी पोलिसांना हवे आहेत, याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली होती. ‘लोकमत’ने दिलेल्या या वृत्ताची गंभीर दखल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी घेतली. यानंतर त्यांनी संबंधित गुन्हेगारांना कोर्टाकडून फरारी घोषित करणे आणि त्यांची चल-अचल संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिका-यांना दिले. आदेश प्राप्त होताच पोलीस ठाणेप्रमुखांनी त्यांना वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली. 

पहिल्या टप्प्यांत ३५ गुन्हेगारांना फरारी घोषित करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळविले. याबाबतची नोटीस आरोपीच्या घराच्या दारावर आणि प्रमुख चौक, गर्दीच्या ठिकाणी लावण्याची कार्यवाही सुरू झाली. महिनाभरात हे आरोपी हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाकडून घेतला जाणार आहे.

औरंगाबाद शहरात प्रथमच कारवाईयाविषयी बोलताना पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, गुन्हा केल्यापासून पसार झालेले आरोपी न सापडल्यास त्यांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई पोलिसांना करता येते. मात्र, आजपर्यंत शहर पोलिसांनी अशी कारवाई केली नव्हती. परिणामी, वॉन्टेड गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. ही बाब गंभीरतेने घेत आम्ही आता वॉन्टेड गुन्हेगारांना सीआरपीसी सेक्शन ८२ नुसार फरारी घोषित करण्याची आणि नंतर कलम ८३ नुसार त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली. पहिल्या टप्प्यात ३५ गुन्हेगारांची संपत्ती जप्त केली जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस