शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

१२ हजार सेवानिवृत्तांची ‘पेन्शन’ नसल्याने परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 1:55 PM

उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे.

ठळक मुद्देसेवेनंतर हेलपाटे मारण्याची वेळ वेतन पडताळणीच्या संचिकांचा ढीग

- विकास राऊत 

औरंगाबाद : शासकीय सेवेची संधी मिळाल्यानंतर जो आनंद कर्मचाऱ्याच्या मनात रुजू होताना असतो, तेवढेच दु:ख आणि वेदना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येत आहे. ३० ते ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीचे पेन्शन वेळेवर मिळण्याच्या व उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे. वर्षापासून १२ हजार सेवानिवृत्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परवड सुरू आहे. सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणी संचिकांचा ढीग कोषागार विभागात पडून असून, आॅनलाईन व संचिका आवकीच्या ज्येष्ठतेनुसारच त्या तपासल्या जात आहेत. या सगळ्या प्रकारात मराठवाड्यातून लांबवरून येणाऱ्या सेवानिवृत्तांचे जे हाल होत आहेत, ते शब्दांत व्यक्त होणे अवघड आहे. त्यातच काही सेवानिवृत्त अपंग आहेत. त्यांना तर कोषागार विभागातील कर्मचारी अतिशय हीन वागणूक देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. 

या सगळ्या चक्रव्यूहात सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणीच्या कामाला गती मिळण्याची आणि त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पाऊल उचलण्याची मागणी होत आहे. कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याची सेवापुस्तिका (वेतन पडताळणी) तो ज्या विभागातून निवृत्त झाला तेथून येते. तेथील आस्थापना लिपिकाने खोडसाळपणा करून पुस्तिका कोषागार विभागाला पाठविताना काही कागदपत्रे दिली नाहीत, तर पुस्तिका त्रुटींमुळे रखडते. कोषागार विभागातून सदरील पुस्तिका पुन्हा संबंधित विभागाला पाठविण्यात येते. हा सगळा प्रवास पाच ते सहा महिन्यांचा असतो. या काळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला काहीही माहिती दिली जात नाही. मग काही दलाल मंडळी पुस्तिका मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना गंडवितात. त्या दलालांची आणि संबंधित लिपिकांची मिलीभगत असते. संचिकेतील त्रुटी पूर्ण करून ती पुन्हा कोषागार विभागाकडे येते. सेवानिवृत्त पुन्हा कोषागार विभागाकडे विचारपूस करण्यासाठी येतात. तेथील अधिकारी, लिपिक सेवानिवृत्तांना अतिशय निम्नदर्जाची वागणूक देत असल्याचे चित्र कार्यालयात रोजचे झालेले आहे.

कोषागार अधिकाऱ्यांचे मत असे...१ आॅगस्ट रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनपडताळणीचे काम सध्या सुरू आहे. लोकांना असे वाटते की, तातडीने मंजुरी मिळावी; परंतु कर्मचारी कमी आहेत. चार ते पाच कर्मचाऱ्यांवर पूर्ण काम करण्याची जबाबदारी आहे. सगळे काम आॅनलाईन चालते, १२ हजार सेवापुस्तिका सध्या आमच्याकडे आहेत. वेतन पडताळणी पुस्तिका पाहताना काही त्रुटी आढळल्या, तर लिपिक पातळीवरच सेवापुस्तिका संबंधित विभागाला पाठविण्यात येते. त्या विभागाकडून संचिका त्रुटी पूर्ण होऊन न आल्यास पुन्हा संचिका पाठविली जाते. १० पुस्तिकांपैकी ८ पुस्तिका नियमित असण्याचे प्रमाण आहे. सातव्या वेतन आयोगामुळे सेवानिवृत्तांच्या पुस्तिका एकदाच विभागाकडे आल्या. पूर्ण कामाचा ताण चार ते पाच कर्मचाऱ्यांवर आहे. विभागाच्या सर्व सेवापुस्तिका येथे येतात. कार्यालयाकडे रोज नागरिकांची गर्दी वाढते आहे; परंतु सगळे काही आॅनलाईन आहे. त्यामुळे काही करता येत नाही. असे प्रभारी सहसंचालक तथा कोषागार अधिकारी आर.व्ही. लिंगणवाड यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPensionनिवृत्ती वेतनfundsनिधी