शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

सहा महिन्यांत तयार झाले ३०० शेततळे; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:02 PM

कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील ८८४ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत.

ठळक मुद्देया शेततळ्यांसाठी चांगला प्रतिसाद देत सुमारे ९५७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यापैकी ८८४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

- रऊफ शेख 

फुलंब्री ( औरंगाबाद ): तालुक्यात कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील ८८४ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित शेततळी लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, ३०० हून अधिक शेततळ्यांची कामे पूर्ण केल्यामुळे आगामी काळात पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत यंदा ४१३ शेततळे देण्याचे ठरविले होते. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या शेततळ्यांसाठी चांगला प्रतिसाद देत सुमारे ९५७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यापैकी ८८४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी गत सहा महिन्यांत तालुक्यातील ३०० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना शेततळे मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात उत्पादन वाढीमुळे बळीराजाला सुगीचे दिवस येतील, यात शंका नाही. 

तालुक्यात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी शेततळ्यांशिवाय पर्याय नाही. यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात पाऊस न झाल्यास पिकांवर ताण येतो. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जाते; मात्र आता शेततळ्यांमुळे पिकांना आधार मिळणार आहे. 

दरम्यान, फुलंब्री तालुक्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आतापर्यंत ८८४ शेतकऱ्यांच्या शेततळ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना टप्याटप्प्याने योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तालुक्यातील शेततळ्यांमुळे उत्पादन  वाढीस मदत होईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर यांनी व्यक्त केला आहे.

शेततळ्याचे फायदे- पाणलोट क्षेत्राच्या भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.- आपत्कालीन स्थितीत पिकाला पाणी देणे शक्य होते.- पिकाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ.- चिभड व पाणथळ जमीन सुधारण्यासाठी उपयोग.- मत्स्यसंवर्धन करून उत्पादन काढले जाऊ शकते.- पिकावर औषधी फवारणी करण्यासाठी पाणी मिळते.- दुष्काळ परिस्थितीत जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद