शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे महिनाभरात ३० रुग्ण; साडेचार हजार ठिकाणी डासअळींची उत्पत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 3:37 PM

महिनाभरात जिल्ह्यात तब्बल ३० जणांना डेंग्यूची लागण झाली.

औरंगाबाद : पावसाच्या विश्रांतीबरोबर शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूने डोके वर काढले आहे. महिनाभरात जिल्ह्यात तब्बल ३० जणांना डेंग्यूची लागण झाली. औरंगाबादेत १८ रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या महिनाभरात मोजके दिवस पाऊस पडला. त्यातून ठिकठिकाणी पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागला आणि जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा पडला.

जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या गेल्या ७ महिन्यांत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळले होते. पावसामुळे रुग्णसंख्या महिनाभरात दुपटीने वाढली. गेल्या महिनाभरात ३० जणांना डेंग्यूची लागण झाली. यामध्ये ग्रामीण भागांत १२, तर औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत १८ रुग्ण सापडले. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या पाहता हा आकडा मोठा असल्याची शक्यता आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यावर आरोग्य विभागातर्फे भर दिला जातो; परंतु शहर आणि ग्रामीण भागामध्ये आढळून येणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पाहता हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसते. जिल्ह्यात महिनाभरात ४ हजार ४३१ ठिकाणी डासअळींची उत्पत्ती होत असल्याचे आढळले. २६९ ठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट करण्यात आली, तर ४ हजार १६२ ठिकाणचे पाणी रिकामे करून डासअळी नष्ट करण्यात आली. डास प्रतिबंधात्मक उपायाबरोबर आठवड्यातून किमान एक दिवस  भांडी कोरडी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावीपाऊस पडून गेल्यानंतर डास उत्पत्तीने डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. पैठण येथे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे; परंतु तो डेंग्यूचा रुग्ण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. नागरिकांनीही पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यूAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी