शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन; प्रमाण वाढल्याने डॉक्टरांवर ताण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:34 IST

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिकशहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. येथील शीतगृहात २० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे, दिवसेंदिवस या ठिकाणी शवविच्छेदनाचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी २ हजार ४८० तर गतवर्षी २ हजार ५०० तर यंदा हा आकडा आतापर्यंत २५०० वर पोहोचला आहे. आगामी दहा दिवसांत हा आकडा २ हजार ६०० वर पोहोचेल,असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले. 

दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले. त्यामुळे घाटी रुग्णालयावर शवविच्छेदनाचा किती भार आहे, हे स्पष्ट होते. घाटीतील शवविच्छेदनगृहात एकावेळी दोन ते तीन डॉक्टर कार्यरत असतात. डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होते. डॉक्टरांनी नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणावर शंका असेल, तर शवविच्छेदन केले पाहिजे; अन्यथा जर मृत्यूचे कारण स्पष्ट असेल, तर शवविच्छेदन करण्याचे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदन होतात.  मेडिकोलीगल केसेस आणि अन्य कारणांमुळे शवविच्छेदन करणे आवश्यक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तीनशेवर शवविच्छेदनजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयात वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली.

...असा आहे ताणघाटीत शवविच्छेदनासाठी ७ वरिष्ठ डॉक्टर, तर ४ ज्युनिअर डॉक्टर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे आणि शवविच्छेदनाबरोबर न्यायालयात साक्ष देणे, शवविच्छेदन अहवाल पूर्ण करणे, पोलिसांच्या शंकांना उत्तरे देणे अशी अन्य जबाबदारीही डॉक्टरांना पार पाडावी लागत आहे. १ हजार शवविच्छेदनासाठी सध्याचे हे डॉक्टर्स पुरेसे आहे; परंतु प्रत्यक्षात अडीच हजारांवर शवविच्छेदन होतात. प्रत्येक ५०० शवविच्छेदनासाठी २ पोस्ट वाढल्या पाहिजे. येथील कामाचे स्वरूप पाहता ६ डॉक्टरांची आवश्यकता आहे,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या कारणांसाठी होते शवविच्छेदन१. विविध अपघाती मृत्यू.२. मारहाण, खून अशा गुन्हेगारी घटनांतील मृत्यू.३. विष प्राशन, अन्नातून विषबाधेतून मृत्यू.४. गळफास आणि आत्महत्या प्रकरणे.५. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप.६. शंकास्पद मृत्यूसह अन्य काही कारणे.७. वीज पडणे, पूर अशा नैसर्गिक आपत्कालीन घटनांतील मृत्यू.

विम्यासाठी शवविच्छेदन गरजेचेआपत्कालीन मृत्यू, गुन्हेगारी घटनेतील मृत्यू, अपघाती मृत्यू,आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यक ठरतो. आजारपणामुळे मृत्यू झाल्यास शवविच्छेदनाची गरज नसते. विम्याच्या क्लेमसाठी शवविच्छेदन आवश्यक आहे.-अ‍ॅड. अंगद कानडे-भाटसावंगीकर

...तर शवविच्छेदन टाळता येतेज्या प्रकरणात मृत्यूचे कारण डॉक्टरांना पूर्ण माहिती आहे आणि पोलिसांना ते मान्य असेल, तर शवविच्छेदन टाळता येते; परंतु याचे प्रमाण कमी आहे.‘एमएलसी’ नोंद झाली असेल, संशयास्पद मृत्यू झालेला असेल, मृत्यूचे कारण सांगता येत नसेल तर अशावेळी शवविच्छेदन आवश्यक ठरते.- डॉ. के. यू. झिने, विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र, घाटी रुग्णालय 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद