शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन; प्रमाण वाढल्याने डॉक्टरांवर ताण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:34 IST

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिकशहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. येथील शीतगृहात २० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे, दिवसेंदिवस या ठिकाणी शवविच्छेदनाचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी २ हजार ४८० तर गतवर्षी २ हजार ५०० तर यंदा हा आकडा आतापर्यंत २५०० वर पोहोचला आहे. आगामी दहा दिवसांत हा आकडा २ हजार ६०० वर पोहोचेल,असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले. 

दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले. त्यामुळे घाटी रुग्णालयावर शवविच्छेदनाचा किती भार आहे, हे स्पष्ट होते. घाटीतील शवविच्छेदनगृहात एकावेळी दोन ते तीन डॉक्टर कार्यरत असतात. डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होते. डॉक्टरांनी नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणावर शंका असेल, तर शवविच्छेदन केले पाहिजे; अन्यथा जर मृत्यूचे कारण स्पष्ट असेल, तर शवविच्छेदन करण्याचे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदन होतात.  मेडिकोलीगल केसेस आणि अन्य कारणांमुळे शवविच्छेदन करणे आवश्यक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तीनशेवर शवविच्छेदनजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयात वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली.

...असा आहे ताणघाटीत शवविच्छेदनासाठी ७ वरिष्ठ डॉक्टर, तर ४ ज्युनिअर डॉक्टर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे आणि शवविच्छेदनाबरोबर न्यायालयात साक्ष देणे, शवविच्छेदन अहवाल पूर्ण करणे, पोलिसांच्या शंकांना उत्तरे देणे अशी अन्य जबाबदारीही डॉक्टरांना पार पाडावी लागत आहे. १ हजार शवविच्छेदनासाठी सध्याचे हे डॉक्टर्स पुरेसे आहे; परंतु प्रत्यक्षात अडीच हजारांवर शवविच्छेदन होतात. प्रत्येक ५०० शवविच्छेदनासाठी २ पोस्ट वाढल्या पाहिजे. येथील कामाचे स्वरूप पाहता ६ डॉक्टरांची आवश्यकता आहे,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या कारणांसाठी होते शवविच्छेदन१. विविध अपघाती मृत्यू.२. मारहाण, खून अशा गुन्हेगारी घटनांतील मृत्यू.३. विष प्राशन, अन्नातून विषबाधेतून मृत्यू.४. गळफास आणि आत्महत्या प्रकरणे.५. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप.६. शंकास्पद मृत्यूसह अन्य काही कारणे.७. वीज पडणे, पूर अशा नैसर्गिक आपत्कालीन घटनांतील मृत्यू.

विम्यासाठी शवविच्छेदन गरजेचेआपत्कालीन मृत्यू, गुन्हेगारी घटनेतील मृत्यू, अपघाती मृत्यू,आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यक ठरतो. आजारपणामुळे मृत्यू झाल्यास शवविच्छेदनाची गरज नसते. विम्याच्या क्लेमसाठी शवविच्छेदन आवश्यक आहे.-अ‍ॅड. अंगद कानडे-भाटसावंगीकर

...तर शवविच्छेदन टाळता येतेज्या प्रकरणात मृत्यूचे कारण डॉक्टरांना पूर्ण माहिती आहे आणि पोलिसांना ते मान्य असेल, तर शवविच्छेदन टाळता येते; परंतु याचे प्रमाण कमी आहे.‘एमएलसी’ नोंद झाली असेल, संशयास्पद मृत्यू झालेला असेल, मृत्यूचे कारण सांगता येत नसेल तर अशावेळी शवविच्छेदन आवश्यक ठरते.- डॉ. के. यू. झिने, विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र, घाटी रुग्णालय 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद