शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराला ३ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:17 IST

शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्तांचा निर्णय : कडक उन्हाळ्यात नागरिकांची भटकंती थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे. ज्या वॉर्डांना पूर्वी सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणी मिळत होते त्यांना आता चौथ्या दिवशीच पाणी मिळणार आहे. अनेक वॉर्डांना दोन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. आता त्यांना एक दिवस कळ सहन करावी लागणार आहे.मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ‘झोपा काढा’आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी, नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातच अंथरूण लावले होते. रात्री ९ वाजता प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतरच नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांना ठणकावले की, रात्रभर बसून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करून वेळापत्रक बुधवारी माझ्याकडे आणावे.तीन दिवसांआड प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालेच पाहिजे, असे नियोजन असावे, अशी सूचना त्यांनी केली. कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहल यांनी वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. त्यांनी या नवीन वेळापत्रकाला क्षणार्धात मंजुरीही दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी तिसºया दिवशीचे टप्पे संपविण्यात येतील. शुक्रवारपासून परत शहरात पाण्याचा पहिला टप्पा सुरू होईल. ११ मेपासून संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल.कोणाला फायदा होणारगुलमंडी, राजाबाजार, शहागंज, लोटाकारंजा, औरंगपुरा, किराडपुरा, बारुदगरनाला, अल्तमश कॉलनी, रहेमानिया कॉलनी, बारी कॉलनी, जकात नाका, बायजीपुरा, रोशनगेट, रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, जाधववाडी, सुरेवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, मिलकॉर्नर, भोईवाडा, नागेश्वरवाडी, समर्थनगर आदी वॉर्डांना चौथ्या दिवशी पाणी मिळणार आहे.दोन दिवसांआड पाणी द्यामाजी महापौरांसह युतीच्या नगरसेवकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागले ही आमच्यासाठी खूप भूषणावह बाब नाही. प्रशासनाच्या असंख्य चुकांमुळे ही वेळ आली आहे. शहरात दररोज १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाणी मनपाकडे जमा होते. शहराला दररोज २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. मनपाकडे आणखी ५० एमएलडी पाणी अतिरिक्त राहते. दोन दिवसांआड पाणी देणे मनपाला सहज शक्य आहे. तीन दिवसाआड पाणी देण्याऐवजी प्रशासनाने दोन दिवसाआड पाणी द्यायला हवे. तीन दिवसाआड पाणी प्रशासन देणार असेल तर ४०५ एमएलडी पाणी जमा होणार आहे. गरजेपेक्षा दुप्पट पाणी शहरात राहील. आता टाक्या पूर्ण क्षमतेने भरून पाणीपुरवठा करायला हवा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.क ाँग्रेसचेही व्यापक आंदोलनउन्हाळा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने महापालिकेसमोर व्यापक आंदोलन केले होते. किराडपुरा आणि परिसरातील पाच ते सहा वॉर्डांना पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते.काँग्रेसने मनपाकडे तीन दिवसांआड पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. प्रशासनानेही लेखी स्वरुपात तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई