शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराला ३ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:17 IST

शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्तांचा निर्णय : कडक उन्हाळ्यात नागरिकांची भटकंती थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे. ज्या वॉर्डांना पूर्वी सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणी मिळत होते त्यांना आता चौथ्या दिवशीच पाणी मिळणार आहे. अनेक वॉर्डांना दोन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. आता त्यांना एक दिवस कळ सहन करावी लागणार आहे.मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ‘झोपा काढा’आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी, नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातच अंथरूण लावले होते. रात्री ९ वाजता प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतरच नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांना ठणकावले की, रात्रभर बसून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करून वेळापत्रक बुधवारी माझ्याकडे आणावे.तीन दिवसांआड प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालेच पाहिजे, असे नियोजन असावे, अशी सूचना त्यांनी केली. कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहल यांनी वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. त्यांनी या नवीन वेळापत्रकाला क्षणार्धात मंजुरीही दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी तिसºया दिवशीचे टप्पे संपविण्यात येतील. शुक्रवारपासून परत शहरात पाण्याचा पहिला टप्पा सुरू होईल. ११ मेपासून संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल.कोणाला फायदा होणारगुलमंडी, राजाबाजार, शहागंज, लोटाकारंजा, औरंगपुरा, किराडपुरा, बारुदगरनाला, अल्तमश कॉलनी, रहेमानिया कॉलनी, बारी कॉलनी, जकात नाका, बायजीपुरा, रोशनगेट, रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, जाधववाडी, सुरेवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, मिलकॉर्नर, भोईवाडा, नागेश्वरवाडी, समर्थनगर आदी वॉर्डांना चौथ्या दिवशी पाणी मिळणार आहे.दोन दिवसांआड पाणी द्यामाजी महापौरांसह युतीच्या नगरसेवकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागले ही आमच्यासाठी खूप भूषणावह बाब नाही. प्रशासनाच्या असंख्य चुकांमुळे ही वेळ आली आहे. शहरात दररोज १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाणी मनपाकडे जमा होते. शहराला दररोज २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. मनपाकडे आणखी ५० एमएलडी पाणी अतिरिक्त राहते. दोन दिवसांआड पाणी देणे मनपाला सहज शक्य आहे. तीन दिवसाआड पाणी देण्याऐवजी प्रशासनाने दोन दिवसाआड पाणी द्यायला हवे. तीन दिवसाआड पाणी प्रशासन देणार असेल तर ४०५ एमएलडी पाणी जमा होणार आहे. गरजेपेक्षा दुप्पट पाणी शहरात राहील. आता टाक्या पूर्ण क्षमतेने भरून पाणीपुरवठा करायला हवा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.क ाँग्रेसचेही व्यापक आंदोलनउन्हाळा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने महापालिकेसमोर व्यापक आंदोलन केले होते. किराडपुरा आणि परिसरातील पाच ते सहा वॉर्डांना पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते.काँग्रेसने मनपाकडे तीन दिवसांआड पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. प्रशासनानेही लेखी स्वरुपात तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई