शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

औरंगाबाद शहराला ३ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:17 IST

शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्तांचा निर्णय : कडक उन्हाळ्यात नागरिकांची भटकंती थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे. ज्या वॉर्डांना पूर्वी सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणी मिळत होते त्यांना आता चौथ्या दिवशीच पाणी मिळणार आहे. अनेक वॉर्डांना दोन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. आता त्यांना एक दिवस कळ सहन करावी लागणार आहे.मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ‘झोपा काढा’आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी, नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातच अंथरूण लावले होते. रात्री ९ वाजता प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतरच नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांना ठणकावले की, रात्रभर बसून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करून वेळापत्रक बुधवारी माझ्याकडे आणावे.तीन दिवसांआड प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालेच पाहिजे, असे नियोजन असावे, अशी सूचना त्यांनी केली. कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहल यांनी वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. त्यांनी या नवीन वेळापत्रकाला क्षणार्धात मंजुरीही दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी तिसºया दिवशीचे टप्पे संपविण्यात येतील. शुक्रवारपासून परत शहरात पाण्याचा पहिला टप्पा सुरू होईल. ११ मेपासून संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल.कोणाला फायदा होणारगुलमंडी, राजाबाजार, शहागंज, लोटाकारंजा, औरंगपुरा, किराडपुरा, बारुदगरनाला, अल्तमश कॉलनी, रहेमानिया कॉलनी, बारी कॉलनी, जकात नाका, बायजीपुरा, रोशनगेट, रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, जाधववाडी, सुरेवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, मिलकॉर्नर, भोईवाडा, नागेश्वरवाडी, समर्थनगर आदी वॉर्डांना चौथ्या दिवशी पाणी मिळणार आहे.दोन दिवसांआड पाणी द्यामाजी महापौरांसह युतीच्या नगरसेवकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागले ही आमच्यासाठी खूप भूषणावह बाब नाही. प्रशासनाच्या असंख्य चुकांमुळे ही वेळ आली आहे. शहरात दररोज १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाणी मनपाकडे जमा होते. शहराला दररोज २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. मनपाकडे आणखी ५० एमएलडी पाणी अतिरिक्त राहते. दोन दिवसांआड पाणी देणे मनपाला सहज शक्य आहे. तीन दिवसाआड पाणी देण्याऐवजी प्रशासनाने दोन दिवसाआड पाणी द्यायला हवे. तीन दिवसाआड पाणी प्रशासन देणार असेल तर ४०५ एमएलडी पाणी जमा होणार आहे. गरजेपेक्षा दुप्पट पाणी शहरात राहील. आता टाक्या पूर्ण क्षमतेने भरून पाणीपुरवठा करायला हवा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.क ाँग्रेसचेही व्यापक आंदोलनउन्हाळा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने महापालिकेसमोर व्यापक आंदोलन केले होते. किराडपुरा आणि परिसरातील पाच ते सहा वॉर्डांना पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते.काँग्रेसने मनपाकडे तीन दिवसांआड पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. प्रशासनानेही लेखी स्वरुपात तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई