शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

जिल्ह्यात २.८५ लाख लोकांनी घेतली लस, पण दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ८.५९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:05 AM

औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरण सुरू होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत २ लाख ८५ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरण सुरू होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत २ लाख ८५ हजार लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, यात आतापर्यंत ८.५९ टक्के म्हणजे २४ हजार ५६० लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे ३ महिन्यांच्या लसीकरणात जेमतेम २४ हजार नागरिकांत प्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकली. विशेष म्हणजे ज्यांना सर्वात आधी कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली होती. परंतु तीन महिन्यांत केवळ ४५.१७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनीच दुसरा डोस घेतला आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. पुढील टप्प्यात ६० वर्षांवरील, विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील आणि नंतर ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येऊ लागली. गेल्या ३ महिन्यांत जिल्ह्यात कोरोना लसीचे ३ लाख १० हजार १५७ डोस आतापर्यंत देण्यात आलेले आहेत. यात पहिल्या डोसचे प्रमाण २ लाख ८५ हजार ५९७ इतके आहे. तर दुसऱ्या डोसचे प्रमाण २४ हजार ५६० आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर किमान १५ ते १६ दिवसांनंतर प्रतिकारशक्ती तयार होते, असे सांगितले जाते. त्यामुळे ही प्रतिकाशक्ती तयार होण्यापासून नागरिक अद्यापही दूर असल्याची स्थिती आहे.

----

लसीकरणाची स्थिती

आरोग्य कर्मचारी

पहिला डोस- ३३,९४५

दुसरा डोस-१५,३३५

-----

फ्रंटलाइन वर्कर्स

पहिला डोस- ४२,७८३

दुसरा डोस- ५,६९०

--------

४५ वर्षांवरील नागरिक

पहिला डोस- १,०३,६७२

दुसरा डोस- १,४०८

----

६० वर्षांवरील नागरिक

पहिला डोस- १,०५,१९७

दुसरा डोस- २,१२७

---