शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

राज्यात २८ हजार ३५९ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 06:01 IST

‘लोकमत’च्या राज्यभरातील हॅलो टीमने मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

औरंगाबाद : राज्यात शहरांना जे जमले नाही ते गावकऱ्यांनी करून दाखवले. राज्यातील एकूण ४३ हजार २५ गावांपैकी तब्बल २८ हजार ३५९ गावांनी ‘कोरोना’ला वेशीच्या आत येऊच दिले नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली असताना या गावांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. सर्वाधिक कोरोनामुक्त गावे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आहेत. ‘लोकमत’च्या राज्यभरातील हॅलो टीमने मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.>कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनामुक्त गावे?कोरोनाचा अद्याप शिरकाव न झालेली १,००० पेक्षा जास्त गावे असलेल्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, अमरावती, नांदेड, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, बीड, रत्नागिरी, बुलडाणा आणि जळगाव यांचा क्रमांक लागतो.>या गावांनी काय केले?परजिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतरच गावात प्रवेश.वेशीबाहेर सॅनिटायझर आणि हात धुण्यासाठी व्यवस्था.बाहेरगावाहून भाजीपाल्यासह इतर वस्तू घेऊन येण्यास प्रतिबंध.बाहेरगावातील नातेवाईकांसह सर्वांनाच गावबंदी. काही कारणास्तव बाहेरील व्यक्ती आलीच, तर तिच्या सर्व वस्तू निर्जंतुक आणि सॅनिटाईझ करून गावात प्रवेश.अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच गावाबाहेर जाण्यास परवानगी. बियाणे-खत खरेदीसाठी चार-पाच जणांचा ग्रुप सर्व खबरदारीसह शहराच्या ठिकाणी जाणार आणि आल्यानंतर अंघोळीसह कपडे धुणे आदी काळजी घेणार. काही गावांनी गावातच केली व्यवस्था.अतिजोखमीचे रुग्ण, वृद्ध, गरोदर महिला आदींचे सर्वेक्षण करून आरोग्य विभागामार्फत गावातच उपचार.अंगणवाडी सेविका, दक्षता समिती आणि ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर निगराणी.प्रशासनाच्या सूचनांचे पालन. गर्दी करण्यास बंदी. आठवडी बाजार बंद. सौम्य लक्षणे आढळताच होम-क्वारंटाईन.वेळोवेळी गावात जंतुनाशक फवारणी. स्वच्छता मोहीम.गावात उत्पादित दूध-भाजीपाल्याचे गावातच वितरण. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस