नऊ मतदारसंघांत २७ भरारी पथके
By Admin | Updated: September 17, 2014 01:16 IST2014-09-17T01:08:58+5:302014-09-17T01:16:23+5:30
औरंगाबाद : निवडणुकीतील दारू आणि पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात २७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

नऊ मतदारसंघांत २७ भरारी पथके
औरंगाबाद : निवडणुकीतील दारू आणि पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात २७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ पथके कार्यरत झाली असून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम, दारू किंवा मौल्यवान भेटवस्तू आढळून आल्यास ते जमा करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात विधानसभेचे ९ मतदारसंघ असून सर्व मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. भरारी पथके मतदारसंघात ठिकठिकाणी वाहनांची झडती घेऊन पैसे, भेटवस्तू किंवा दारूची वाहतूक तपासतील. निवडणूक काळात कुणालाही पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम बाळगता येणार नाही. संबंधित रक्कम कोणत्या कारणासाठी वापरली जाणार होती याची तपासणी केली जाईल. सबळ कारण आढळून न आल्यास ती जप्त होईल. दारू किंवा मौल्यवान भेटवस्तूंच्या वाहतुकीवरही या काळात लक्ष ठेवले जाईल.
परवानग्यांसाठी एक खिडकी योजना
उमेदवारांना रॅली, सभा, वाहनांचा वापर आदींसाठी परवानग्या देण्याची व्यवस्था त्या त्या विधानसभा क्षेत्राच्या कार्यालयात करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान फेसबुक, व्हॉटस् अॅपवरून एखाद्या उमेदवाराविषयी, व्यक्तीविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे आचारसंहितेचा भंग ठरणार आहे, अशा प्रकरणात केवळ पोस्ट टाकणाराच नव्हे तर ती पोस्ट फॉरवर्ड करणाराही दोषी ठरणार आहे.
४त्यामुळे संबंधितांविरुद्ध आयटी अॅक्टच्या कलम ६६ अंतर्गत कारवाई केली जाईल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.