शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी पटसंख्या; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 12:22 IST

Aurangabad High Court: खंडपीठाचे शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश

औरंगाबाद : राज्यातील शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार कार्डनुसार दुबार पडताळणी केली असता पुन्हा २४ लाख विद्यार्थी दुबार आढळल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ( Aurangabad High Court ) करण्यात आला आहे. राज्यभरातील दुबार पडताळणीचा अहवाल पुढील सुनावणीच्यावेळी सादर करण्याचे निर्देश न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लड्डा यांनी शासनास दिले आहेत.

खंडपीठाने राज्य शासनासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून, आता या जनहित याचिकेवर ९ डिसेंबर २०२१ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यामुळे पुनर्तपासणीच्या नावाखाली दुबार विद्यार्थ्यांचे प्रकरण थंड बस्त्यात घालण्यास खीळ बसली आहे.

नेमके काय आहे प्रकरण :ब्रिजमोहन धीरजप्रसाद मिश्रा यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटल्यानुसार २०११ साली झालेल्या पटपडताळणीत विद्यार्थ्यांची सुमारे २० लाख नावे दुबार आढळली होती. त्यावरून दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी शासनाने संंबंधितांवर फौजदारी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याअनुषंगाने कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी होऊ नये यासाठी शासनाने ३ जुलै २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे सरल प्रणालीद्वारे संच मान्यतेसाठी यंदा विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची सक्ती केल्यानंतर राज्यभरात पहिली ते बारावीमध्ये सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी (दोनदा नावनोंदणी) केल्याचे आढळले असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. बीड जिल्ह्यात प्राथमिक विभागात १६०६३ बोगस विद्यार्थ्यांची नोंदी झाल्याचे आढळले. तसा अहवाल शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला. तर नांदेडमध्ये ४५०००, परभणीत १४००० आणि लातूरमध्ये १७००० बोगस विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्याचे आढळले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

फौजदारी कारवाई आणि निधी वसूल कराविद्यार्थ्यांची दुबार नोंदणी करणारे संबंधित अधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी व इतर अनुषंगिक कारवाई करून दुबार नोंदीद्वारे वाढीव शिक्षकांचे वेतन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, माध्यान्ह भोजन, गणवेष आदीसाठी शासनाकडून घेतलेल्या जादा निधीची वसुली कसूरदारांकडून करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. ॲड. देशमुख यांना ॲड. माजीद शेख आणि ॲड. रुपेश जांगडा सहकार्य करीत आहेत. शासनातर्फे सरकारी वकील डी.आर. काळे काम पाहत आहेत.

पुनर्तपासणीचे आदेशसरल प्रणालीमध्ये नोंदविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती व शाळेतील पटावरील नोंदी यांच्यामध्ये तफावत आढळली आहे. अशा विद्यार्थ्यांचा डेटा सरल प्रणालीवरून प्राप्त करून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्याचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य प्रकल्प संचालकांना दिला आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीEducationशिक्षण