शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी पटसंख्या; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 12:22 IST

Aurangabad High Court: खंडपीठाचे शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश

औरंगाबाद : राज्यातील शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार कार्डनुसार दुबार पडताळणी केली असता पुन्हा २४ लाख विद्यार्थी दुबार आढळल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ( Aurangabad High Court ) करण्यात आला आहे. राज्यभरातील दुबार पडताळणीचा अहवाल पुढील सुनावणीच्यावेळी सादर करण्याचे निर्देश न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लड्डा यांनी शासनास दिले आहेत.

खंडपीठाने राज्य शासनासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून, आता या जनहित याचिकेवर ९ डिसेंबर २०२१ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यामुळे पुनर्तपासणीच्या नावाखाली दुबार विद्यार्थ्यांचे प्रकरण थंड बस्त्यात घालण्यास खीळ बसली आहे.

नेमके काय आहे प्रकरण :ब्रिजमोहन धीरजप्रसाद मिश्रा यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटल्यानुसार २०११ साली झालेल्या पटपडताळणीत विद्यार्थ्यांची सुमारे २० लाख नावे दुबार आढळली होती. त्यावरून दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी शासनाने संंबंधितांवर फौजदारी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याअनुषंगाने कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी होऊ नये यासाठी शासनाने ३ जुलै २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे सरल प्रणालीद्वारे संच मान्यतेसाठी यंदा विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची सक्ती केल्यानंतर राज्यभरात पहिली ते बारावीमध्ये सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी (दोनदा नावनोंदणी) केल्याचे आढळले असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. बीड जिल्ह्यात प्राथमिक विभागात १६०६३ बोगस विद्यार्थ्यांची नोंदी झाल्याचे आढळले. तसा अहवाल शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला. तर नांदेडमध्ये ४५०००, परभणीत १४००० आणि लातूरमध्ये १७००० बोगस विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्याचे आढळले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

फौजदारी कारवाई आणि निधी वसूल कराविद्यार्थ्यांची दुबार नोंदणी करणारे संबंधित अधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी व इतर अनुषंगिक कारवाई करून दुबार नोंदीद्वारे वाढीव शिक्षकांचे वेतन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, माध्यान्ह भोजन, गणवेष आदीसाठी शासनाकडून घेतलेल्या जादा निधीची वसुली कसूरदारांकडून करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. ॲड. देशमुख यांना ॲड. माजीद शेख आणि ॲड. रुपेश जांगडा सहकार्य करीत आहेत. शासनातर्फे सरकारी वकील डी.आर. काळे काम पाहत आहेत.

पुनर्तपासणीचे आदेशसरल प्रणालीमध्ये नोंदविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती व शाळेतील पटावरील नोंदी यांच्यामध्ये तफावत आढळली आहे. अशा विद्यार्थ्यांचा डेटा सरल प्रणालीवरून प्राप्त करून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्याचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य प्रकल्प संचालकांना दिला आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीEducationशिक्षण