शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

सिल्लोड तालुक्यात दोन अपघातात २३ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 8:05 PM

गंभीर प्रकृती असलेल्या प्रवास्यांवर औरंगाबाद येथे उपचार करण्यात येत आहेत

ठळक मुद्देयातील १२ प्रवास्यांची प्रकृती गंभीर

सिल्लोड : तालुक्यातील घाटनांद्रा व खुल्लोड या दोन ठिकाणी चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील १२ प्रवास्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. घाटनांद्रा येथे क्रूझर जीप उलटून ५ प्रवासी आणि खुल्लोड येथे पीक अप उलटून १८ प्रवासी जखमी असून हे अपघात दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाले.

अधिक माहिती अशी की, घाटनांद्रा येथून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून पाचोरा येथे जात असताना तीडका घाटात टायर फुटल्याने क्रूझर जीप ( क्र. एम.एच. २८ सी. ४७१० ) उलटली. यात ५ प्रवासी जखमी झाले. तुळसाबाई आनंद घोरपडे ( ५० रा. सावरखेडा),  ज्योती गणेश खेडकर ( ३२, रा.औरंगाबाद ) अनिता शिवाजी साळुंके ( ४०, रा. औरंगाबाद ) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले. तर उशाबाई ज्ञानेश्वर शेळके ( ४० रा. पाचोरा ) ताराबाई धनराज पाटील (४०, रा. वाळीशेवाळा ता.पाचोरा ) हे किरकोळ जखमी असल्याने यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.

तर दुसरा अपघात सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे झाला. उंडणगाव येथून खुल्लोड येथे लग्नासाठी प्रवासी घेऊन जाणारा एक पीक अप वळण रस्त्यावर उलटला. यात १८ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ९ प्रवास्यांची  प्रकृती गंभीर आहे. यात कौसाबाई नरवाडे, मानाबाई विष्णू लांडगे, ओम मारोती सपकाळ, , निलेश प्रभाकर लांडगे, शामराव रामाजी धनवई, संगीता देविदास माळेकर, रुखमनबाई महादेव सपकाळ, संगीता अनिल पैठणकर, साक्षी अशोक सोनवणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. तर गौरी शेषराव नरोडे, रत्ना अरुण मोकासे, आदित्य अरुण मोकासे, पुष्पां पांडुरंग धनवई, ऋषिकेश कृष्णा खोडके, राधा गजानन सपकाळ, सुखदेव रामभाऊ सनांसे, समर्थ गणेश खेडकर, शुभम दिलीप तायडे हे किरकोळ जखमी आहेत. 

यावेळी किशोर अग्रवाल, रुग्ण कल्याण समिती सदस्य हाजी मोहम्मद हनीफ, सुदर्शन अग्रवाल ,राजु गौर, प्रशांत शिरसागर. विनोद भोजवानी, गणेश डकले, सुनील इंगळे,फहीम पठाण,अशोक गायकवाड यांनी जखमींना औरंगाबाद येथे हलविण्यात मदत केली.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल