शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

महापालिकेत तब्बल २२८७ पदे रिक्त; सध्या भरती नसल्याने दलालांपासून रहा सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 17:01 IST

महापालिका प्रशासनाने मागील दोन दशकांपासून नवीन भरतीच केली नाही.

ठळक मुद्देआकृतीबंधानुसार मंजूर पदे ५ हजार ७१९ दरवर्षी किमान ५० ते ६० अधिकारी- कर्मचारी निवृत्त

औरंगाबाद : महापालिकेत रिक्त पदांचा अनुशेष दर महिन्याला हळूहळू वाढतोय. नवीन आकृतीबंधानुसार शासनाने महापालिकेला ५ हजार ७१९ पदांना मंजुरी दिली. सध्या महापालिकेच्या आस्थापनेवर ३ हजार ४३२ पदे भरलेली आहेत. २२८७ पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अर्ध्या कामकाजाची भिस्त असली तरी कोणतीही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विभागातील कामकाजावर चांगलाच परिणाम होत असल्याचे दिसून येते.

महापालिका प्रशासनाने मागील दोन दशकांपासून नवीन भरतीच केली नाही. दरवर्षी किमान ५० ते ६० अधिकारी- कर्मचारी निवृत्त होतात. रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येतो. सध्या एका अधिकाऱ्याकडे किमान तीन ते चार विभागांचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे कोणतेही काम लक्षपूर्वक करता येत नाही. हे झाले अधिकाऱ्यांच्या बाबतीत. कर्मचारी निवृत्त झाला, तर त्याचा पदभार दुसऱ्या समकक्ष कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात येत नाही. त्याच्या जागेवर दुसरा कर्मचारी येईल म्हणून त्याचे कामकाज तसेच गुंडाळून ठेवलेले असते. खूपच गरज असेल, तेव्हा एखादा-दुसरा कर्मचारी त्याचे काम करून घेतो. रिक्त पदांचा अनुशेष वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने खासगी एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी घेतले. हे कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे ते स्वत: हित जोपासण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर कार्यालयीन, फायलींसंदर्भातील जबाबदारीही प्रशासनाला सोपविता येत नाही. एखादा घोटाळा झाला तर कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई करता येत नाही.

हेही वाचा - विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग प्रकरण; विद्यापीठाचे पीआरओ संजय शिंदे निलंबित

आकृतीबंध, सेवा भरती नियम प्राप्तमागील अनेक वर्षांपासून महापालिका प्रशासन शासनाकडून नवीन आकृतीबंध मंजूर करून घेण्यात व्यस्त होते. त्यानंतर आता शासनाकडून सेवा भरती नियमही प्राप्त झाले. अनेक पदांच्या बाबतीत सेवा भरती नियमात विसंगती असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा हा वाद शासनाकडे जाण्याची शक्यता वर्तविली जातेय.

सोशल मीडियावर भरतीही ओहोटीमहापालिकेत पाच हजार रिक्त पदांची भरती होणार म्हणून सोशल मीडियावर दोन दिवसांपासून मेसेज व्हायरल होत आहे. ही बाब खरी असल्याचे दाखविण्यासाठी आकृतीबंध, सेवा भरती नियमांचा आधार घेतला जातोय. वास्तविक पाहता महापालिकेने सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. भरतीच्या नावावर दलालांपासून सावधान राहावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

नवीन पदांचा गोषवारासंवर्ग- मंजूर पदे- भरलेली पदे- रिक्त पदेगट-अ- १४९-३८-१११गट ब- ५८- ०९- ४९गट क- २२०९- ८८८- १३२१गट ड- ३३०३- २४९७- ८०६

हेही वाचा - हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSocial Mediaसोशल मीडियाAurangabadऔरंगाबाद