शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत तब्बल २२८७ पदे रिक्त; सध्या भरती नसल्याने दलालांपासून रहा सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 17:01 IST

महापालिका प्रशासनाने मागील दोन दशकांपासून नवीन भरतीच केली नाही.

ठळक मुद्देआकृतीबंधानुसार मंजूर पदे ५ हजार ७१९ दरवर्षी किमान ५० ते ६० अधिकारी- कर्मचारी निवृत्त

औरंगाबाद : महापालिकेत रिक्त पदांचा अनुशेष दर महिन्याला हळूहळू वाढतोय. नवीन आकृतीबंधानुसार शासनाने महापालिकेला ५ हजार ७१९ पदांना मंजुरी दिली. सध्या महापालिकेच्या आस्थापनेवर ३ हजार ४३२ पदे भरलेली आहेत. २२८७ पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अर्ध्या कामकाजाची भिस्त असली तरी कोणतीही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विभागातील कामकाजावर चांगलाच परिणाम होत असल्याचे दिसून येते.

महापालिका प्रशासनाने मागील दोन दशकांपासून नवीन भरतीच केली नाही. दरवर्षी किमान ५० ते ६० अधिकारी- कर्मचारी निवृत्त होतात. रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येतो. सध्या एका अधिकाऱ्याकडे किमान तीन ते चार विभागांचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे कोणतेही काम लक्षपूर्वक करता येत नाही. हे झाले अधिकाऱ्यांच्या बाबतीत. कर्मचारी निवृत्त झाला, तर त्याचा पदभार दुसऱ्या समकक्ष कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात येत नाही. त्याच्या जागेवर दुसरा कर्मचारी येईल म्हणून त्याचे कामकाज तसेच गुंडाळून ठेवलेले असते. खूपच गरज असेल, तेव्हा एखादा-दुसरा कर्मचारी त्याचे काम करून घेतो. रिक्त पदांचा अनुशेष वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने खासगी एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी घेतले. हे कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे ते स्वत: हित जोपासण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर कार्यालयीन, फायलींसंदर्भातील जबाबदारीही प्रशासनाला सोपविता येत नाही. एखादा घोटाळा झाला तर कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई करता येत नाही.

हेही वाचा - विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग प्रकरण; विद्यापीठाचे पीआरओ संजय शिंदे निलंबित

आकृतीबंध, सेवा भरती नियम प्राप्तमागील अनेक वर्षांपासून महापालिका प्रशासन शासनाकडून नवीन आकृतीबंध मंजूर करून घेण्यात व्यस्त होते. त्यानंतर आता शासनाकडून सेवा भरती नियमही प्राप्त झाले. अनेक पदांच्या बाबतीत सेवा भरती नियमात विसंगती असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा हा वाद शासनाकडे जाण्याची शक्यता वर्तविली जातेय.

सोशल मीडियावर भरतीही ओहोटीमहापालिकेत पाच हजार रिक्त पदांची भरती होणार म्हणून सोशल मीडियावर दोन दिवसांपासून मेसेज व्हायरल होत आहे. ही बाब खरी असल्याचे दाखविण्यासाठी आकृतीबंध, सेवा भरती नियमांचा आधार घेतला जातोय. वास्तविक पाहता महापालिकेने सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. भरतीच्या नावावर दलालांपासून सावधान राहावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

नवीन पदांचा गोषवारासंवर्ग- मंजूर पदे- भरलेली पदे- रिक्त पदेगट-अ- १४९-३८-१११गट ब- ५८- ०९- ४९गट क- २२०९- ८८८- १३२१गट ड- ३३०३- २४९७- ८०६

हेही वाचा - हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSocial Mediaसोशल मीडियाAurangabadऔरंगाबाद