शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

महापालिकेकडून माती, दगड उचलण्याचे २२ कोटी रुपये; कंपनीने हळूहळू कचऱ्याचे ‘वजन’ वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 17:57 IST

पहिल्या दिवशीपासून कचरा उचलणाऱ्या कंपनीचा लबाडीचा खेळ

ठळक मुद्देदरमहा अडीच कोटींचे बिल कंपनीच्या चालबाजीचा पर्दाफाशजनतेच्या पैशाची राजरोस लूट 

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या रेड्डी कंपनीने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. फेब्रुवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत कंपनीला २२ कोटींहून अधिक रक्कम महापालिकेने अदा केली आहे. कंपनीने दर महिन्याला शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वजन अत्यंत सोयीस्करपणे वाढविले आहे. कंपनीच्या या चालबाजीत महापालिकेतील अधिकारी व कर्मचारीही सहभागी असल्याचे निदर्शनास येत आहे. 

शनिवारी रेड्डी कंपनीचे तीन हायवा ट्रक नगरसेवकांनी पडेगाव येथे पकडले. पकडलेले ट्रक महापालिकेत आणण्यात आले. हे ट्रक आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी रिकामे करून बघितले. ट्रकमध्ये कचरा कमी आणि माती, दगड मोठ्या प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाले.  आयुक्तांनी कंपनीवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे घाटी रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्टही कचऱ्याच्या वाहनांमध्ये टाकण्यात आला. घाटी प्रशासनावरही फौजदारीचे आदेश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या निर्णयामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

शहरात कचराकोंडी झालेली असताना राज्य शासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. पडेगाव येथे प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी एकच कंपनी असावी म्हणून महापालिकेने रेड्डी कंपनीची नेमणूक केली. एक टन कचरा घरोघरी जाऊन कंपनीने जमा केल्यास मनपा १८६५ रुपये देईल, असे ठरले. कंपनीने मागील एक वर्षामध्ये शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन सुरूच केले नाही.

ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याची जबाबदारी कंपनीवर असतानाही मिक्स कचराच प्रक्रिया केंद्रावर जात आहे. कंपनीचे काम अजिबात समाधानकारक नसतानाही महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी कंपनीसमोर रेड कार्पेट अंथरूण उभे आहेत. कंपनीला शहरात आठ ठिकाणी मोफत पार्किंगची सोय करून दिली. मनपाच्या मालकीच्या ७० रिक्षा कंपनी मोफत वापरत आहे. पार्किंग शुल्क, रिक्षांचे भाडेही मनपा कंपनीकडून वसूल करायला तयार नाही.

फेब्रुवारी २०१९ मध्ये कामाला सुरुवात- पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने शहरात फेब्रुवारी २०१९ मध्ये कचरा उचलण्याचे काम सुरू केले. प्रायोगिक तत्त्वावर काही झोनमध्ये कामाला सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात कंपनीने ३,७१४.४ मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा केला. मनपा अधिकाऱ्यांनीही डोळे बंद करून पहिल्या महिन्याचे बिल ६९ लाख ५५ हजार ९५७ रुपये दिले. - दुसऱ्या महिन्यात कंपनीने ४,५७८.९४ मेट्रिक टन कचरा एका महिन्यात उचलल्याचा दावा केला. मनपाने ८५ लाख ७६ हजार ३५५ रुपये कंपनीला अदा केले. एप्रिल महिन्यात कंपनीने ७,४५९.२६ मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा केला. मनपाने १ कोटी ३९ लाख ७४ हजार ९६७ रुपये कंपनीला त्वरित दिले. - मे महिन्यात कंपनीचा आलेख अचानक खाली आला. या महिन्यात कंपनीने फक्त ९०९४.५ मेट्रिक टन कचरा जमा केला. त्यानंतरही मनपाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कंपनीला १ कोटी ७९ लाख ७३ हजार ८२७ रुपये दिले. सध्या कंपनीला दरमहा अडीच कोटींहून अधिक रक्कम प्रदान करण्यात येत आहे. मागील बारा महिन्यांमध्ये कंपनीला मनपाने किमान २२ कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. 

‘लोकमत’ने घोटाळा उघडकीस  आणला तरी...रेड्डी कंपनी कचऱ्यात दगड, चिंध्या, माती टाकून कशा पद्धतीने वजन वाढवत आहे, याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने जुलै २०१९ मध्ये केला होता. चिकलठाणा प्रक्रिया केंद्रात हायवा ट्रकमध्ये भरून आणलेले मोठमोठे दगड छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आले होते. या घोटाळ्यावर महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे पांघरूण घालण्याचे काम केले. ४घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनीच महापौरांना चौकशी अहवाल देतो असे सांगितले होते. आजपर्यंत भोंबे यांनी चौकशीही केली नाही. कंपनीच्या या सर्व गैरव्यवहाराची माहिती भोंबे आणि त्यांच्या एका निकटवर्तीय वरिष्ठ लिपिकाला आहे. त्यांच्या सहीने कंपनीला आजपर्यंत मनमानी पद्धतीने बिले अदा करण्यात आली आहेत. 

रेड्डी कंपनीला अशी वाटली खिरापतमहिना    वजन (मे.टन)    दिलेली रक्कम    फेब्रुवारी    ३,७१४.४    ६९,५५,९५७माच    ४,५७८.९४    ८५,७६,३५५एप्रिल    ७,४५९.२६    १,३९,७४,९६७मे    ९०९४.५    १,७९,७३,८२७जून    ११,२१०.३६३    २,०९,९२,९३१जुलै    १४,५९३.९०५    २,७२,९०,९१५आॅगस्ट    १३,१९३.८५५    २,५०,०१,१५७सप्टेंबर    १३,५७३.६२    २,५३,७३,६५४आॅक्टोबर    १३,७९८.५५५    २,५८,१५,६१७एकूण        १७,१९,५५,३८०(नोव्हेंबरपासून आजपर्यंत अडीच कोटी दरमहा बिल दिले जात आहे.)

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधी